सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन

मुंबई: प्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं आज निधन झाले. ते ६६ वर्षाचे होते. या ७ मार्चला त्यांनी फिल्मी जगतातल्या सेलिब्रिटींसह होळीते सेलिब्रेशन केले. त्यानंतर ते ८ तारखेला कुटुंबासमवेत होते त्यावेळी त्यांना अचानक बैचेन वाटू लागले. आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करून सतीश कौशिक यांच्या निधनाची माहिती दिली. दरम्यान त्यांची होळीची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल होत आहे.




 गंभीर भूमिका करणारा अभिनेता ते हास्य अभिनेता अशी सतीश कौशिक यांची ओळख होती. शिवाय ते दिग्दर्शकही होते आणि अनेक सिनेमांचे निर्मातेही होते. तेरे नाम हा सिनेमा त्यांच्या दिग्दर्शनाच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉईंट ठरला. सतीश यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

अभिनेते अनुपम खेर हे सतीश कौशिक यांचे जिगरी दोस्त आहेत. अनुपम खेर यांनी ट्विट करून सतीश कौशिक यांच्या निधनाची माहिती दिली. मृत्यू हे या जगाचं अंतिम सत्य आहे. हे मला माहीत आहे. पण माझ्या हयातीत माझा अत्यंत जवळचा मित्र सतीश कौशिक बाबत मी ही गोष्ट लिहील याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता, असं अनुपम खेर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.





आमच्या ४५ वर्षाच्या मैत्रीला अचानक असा पूर्णविराम लागला आहे. हरी ओम शांती. आता सतीश शिवाय आयुष्य पुन्हा पूर्वी सारखं राहणार नाही, अशा पद्धतीने अनुपम खेर यांनी त्यांच्या भावना या ट्विटमधून व्यक्त केल्या आहेत.


बॉलीवुड अभिनेता सलमान खान यानेही सतीश कौशिक यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे.

Comments
Add Comment

आरक्षणाची अंमलबजावणी पुन्हा लांबणीवर पडणार ?

मुंबई : मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांनी ऐन गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन सुरू केले होते. जरांगेंचे आंदोलन

राज्यात नवीन २ लाख रोजगार संधी, ५० हजार कोटींची गुंतवणूक येणार

महाराष्ट्र ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी धोरण २०२५ सन २०५० पर्यंतचे

राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांचा तडकाफडकी राजीनामा

मुंबई : राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारण देत बिरेंद्र सराफ

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे आठ महत्त्वाचे निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत

या उद्योगपतीने घेतली पहिली टेस्ला !

मुंबई : आयनॉक्स ग्रुपचे कार्यकारी संचालक सिद्धार्थ जैन हे भारतातील पहिले उद्योगपती ठरले आहेत, ज्यांनी ‘इंडिया

मुंबईकरांना दिलासा ! मुंबईत ई-बाईक टॅक्सी सेवा सुरू – प्रवास होणार स्वस्त आणि सुलभ

मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबईकरांचा प्रवास आता अधिक सोयीस्कर होणार आहे . शहरात आता इलेक्ट्रिक बाईक