व्याजासकट परतफेड करणार! रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर वार

१९ तारखेला तयार राहा! कदमांनी दिला उद्धव ठाकरेंना इशारा


खेड: या १९ मार्चला खेडमधील याच ठिकाणी याच मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे गुलाब पाटील, शंभूराज देसाई आणि आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत सभा घेऊन उद्धव ठाकरेंची व्याजासकट परतफेड करणार असल्याचा घणाघाती वार रामदास कदम यांनी केला आहे. ते खेडमध्ये एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.


ते म्हणाले, खेड हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आजही आहे आणि उद्याही असेल तसुभरही त्यात फरक पडणार नाही. उद्धव ठाकरे मुंबई ठाणे, पुणे, सिंधूदूर्ग, रत्नागिरी इथून माणसं गोळा करुन आणणार आहेत जणू काही शिवाजी पार्क दसऱ्याची सभाच आहे. इतका धसका त्यांनी रामदास कदमांचा घेतला आहे. पण लोक भाषण एकतील आणि निघून जातील त्याचं पुढे काहीही होणार नाही. कारण मुळातच उद्धव ठाकरेंचे खेडमध्ये स्थानिक समर्थकच नाहीत.


रत्नागिरीतील खेडमध्ये उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी ठाकरे गटाकडून करण्यात आलेली आहे. यावर रामदास कदमांनी या अशा सभेची मी नोंदही घेत नाही असा टोला उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

Comments
Add Comment

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

Narayan Rane : "आमच्यात कटुता असली तरी जिव्हाळा कायम!" भास्कर जाधवांनी व्यक्त केली राणे साहेबांबद्दलची कृतज्ञता;

'त्या' घटनेनंतर जुन्या आठवणींना उजाळा चिपळूण : राजकारणात एकमेकांवर तुटून पडणारे नेते, वैयक्तिक आयुष्यात

फोंडाघाटचा ‘किऱ्याचा आंबा’ होणार जमीनदोस्त

कणकवली : फोंडाघाट, हवेलीनगर येथील शेकडो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक अधिष्ठान आणि मार्गदर्शक आख्यायिका, तसेच

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

उद्यापर्यंत ब्लॉक रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण