खेड: या १९ मार्चला खेडमधील याच ठिकाणी याच मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे गुलाब पाटील, शंभूराज देसाई आणि आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत सभा घेऊन उद्धव ठाकरेंची व्याजासकट परतफेड करणार असल्याचा घणाघाती वार रामदास कदम यांनी केला आहे. ते खेडमध्ये एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
ते म्हणाले, खेड हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आजही आहे आणि उद्याही असेल तसुभरही त्यात फरक पडणार नाही. उद्धव ठाकरे मुंबई ठाणे, पुणे, सिंधूदूर्ग, रत्नागिरी इथून माणसं गोळा करुन आणणार आहेत जणू काही शिवाजी पार्क दसऱ्याची सभाच आहे. इतका धसका त्यांनी रामदास कदमांचा घेतला आहे. पण लोक भाषण एकतील आणि निघून जातील त्याचं पुढे काहीही होणार नाही. कारण मुळातच उद्धव ठाकरेंचे खेडमध्ये स्थानिक समर्थकच नाहीत.
रत्नागिरीतील खेडमध्ये उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी ठाकरे गटाकडून करण्यात आलेली आहे. यावर रामदास कदमांनी या अशा सभेची मी नोंदही घेत नाही असा टोला उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायजर्स हैदराबादशी होत…
मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…
अमित शाहांनी साधला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी…
मुंबई: जम्मू काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे पर्यटकांवर हल्ला होत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा…
मे महिन्याच्या सुरवातीस होणार उद्घाटन मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये (Mumbai Metro) मेट्रो-३ फेज…