मुरबाड : मुरबाड तालुक्यातील मुक्याचे कळभांड गावात मंगळवारी पहाटे दोन वाजता अनोळखी इसमाने लावलेल्या आगीत तीन शेतकऱ्यांचे भाताचे दोन हजार पेंढे जळून खाक झाले. याबाबत मुरबाड तहसीलदार कार्यालयात निवेदन देऊन नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे
गणपत दळवी, मोतीराम जाधव, पांडुरंग दळवी या शेतकऱ्यांनी गुरांच्या चा-यासाठी खळ्यामध्ये भाताचे पेंढे साठवले होते. त्या पेंढ्याना कोणीतरी आग लावली, अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. गावच्या सरपंच कविता चौधरी, पोलीस पाटील अरुण चौधरी यांनी याबाबत तहसील कार्यालयात माहिती कळविल्यानंतर तलाठी आर. के. सुरोशे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.
दरम्यान, आग लावणाऱ्या व्यक्तीचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…