KDMC News : कल्याण - टिटवाळा भागात उद्या पाणी येणार नाही; दोन दिवस पुरेल इतका पाणी साठा करून ठेवा!

कल्याण : एकीकडे सूर्य आग ओकत असताना दुसरीकडे कल्याण डोंबिवलीकरांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागत आहे. उल्हास नदीवरील मोहिली येथील जलशुध्दीकरण केंद्राच्या मुख्य जलवाहिन्यांवर प्रवाह मोजणी मीटर बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. म्हणून कल्याण, टिटवाळा परिसराचा पाणी पुरवठा उद्या (दि २२) बंद राहणार आहे.



कल्याण डोंबिवली महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, उद्या (दि २२) कल्याण, टिटवाळा परिसराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. कल्याण डोंबिवली पालिकेच्या उल्हास नदीवरील मोहिली येथील जलशुध्दीकरण केंद्राच्या अशुध्द आणि शुध्द पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्यांवर प्रवाह मोजणी मीटर बसविण्याचे काम उद्या (दि २२) करण्यात येणार आहे.


या कामासाठी नऊ तासाचा कालावधी लागणार असल्याने या जलवाहिन्यांवरून पाणी पुरवठा होणाऱ्या कल्याण, टिटवाळा परिसराचा पाणी पुरवठा सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या वेळेत बंद राहणार आहे, मंगळवारी दिवसभर पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता विचारात घेऊन नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पाणी साठा करून ठेवावा, तसेच पाण्याचा अपव्यय टाळा, असे आवाहन कल्याण महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Chalisgaon : चाळीसगाव महावितरणाचा अजब कारभार: अधिकारी 'मस्तवाल', जनता 'बेहाल'!

Chalisgaon :  चाळीसगाव शहरासह परिसरात महावितरण विभागाचा मनमानी कारभार शिगेला पोहोचला असून, सध्या 'त्रस्त नागरिक आणि

BCCI SELECTION : BCCI कडून दोन मोठ्या स्पर्धांसाठी भारतीय संघांची घोषणा; श्रेयस अय्यरकडे नेतृत्व, तिलक वर्मा उपकर्णधार

MUMBAI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी इंग्लंड दौरा 2026 आणि आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 (जपान) यासाठी भारतीय पुरुष

BCCI SQUAD SELECTION : भारतीय क्रिकेट संघाच्या निवडीसाठी बीसीसीआयची बैठक सुरू; श्रेयस अय्यरकडे सोपवली जाणार धुरा?

BCCI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) वरिष्ठ निवड समिती आज मुंबईतील मुख्यालयात महत्त्वाची बैठक घेत आहे. या बैठकीत

INDvsAFG TEST : भारत विरुद्ध अफगाणिस्तान; एकमेव कसोटी सामना

PANJAB : मुल्लांपूर (नवी चंदीगड) येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि

Beed Suicide : लग्नाचा १२ वा दिवस अन् नवरदेवाची आत्महत्या! बायकोच्या डायरीत दडलं होतं 'ते' भयानक सत्य

बीड : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे एका तलाठ्याने लग्नानंतर अवघ्या 12 दिवसांत आत्महत्या (Suicide) केल्याच्या

Mumbai News: वाकोला-बीकेसी पुलाबाबत मोठी बातमी! ९८% काम पूर्ण, मुंबईकरांचा प्रवास होणार फक्त 10 मिनिटांत

मुंबई:मुंबई शहरातील वाहतूक कोंडी (Traffic) कमी करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड (SCLR)