पुलाचे काम वेळेत पुर्ण न झाल्यास ठेकेदारावर कारवाई करा : निलेश राणे

Share

कुडाळ (प्रतिनिधी ): कुडाळ तालुक्यातील अणाव घाटचे पेड पुलाचे राहिलेले अर्धवट काम येत्या मे महिन्यापर्यंत पूर्ण न झाल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाई करा अन्यथा आमच्या पद्धतीने काम पूर्ण करून घेऊ, असे भाजपचे प्रदेश सरचिटणीस व माजी खासदार निलेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले. अणाव घाटचे पेड पुलाची पाहणी माजी खासदार निलेश राणे यांनी आज (सोमवारी) केली. यावेळी मोठ्या संख्येने स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

अणाव घाटचे पेड पुलाचे काम गेल्या पाच वर्षापासून सुरू आहे. या अर्धवट कामामुळे ग्रामस्थांची मोठी हेळसांड होत आहे. या अर्धवट राहिलेल्या कामाची पाहणी माजी खासदार निलेश राणे यांनी केली. या पाहणी दरम्यान सार्वजनिक बांधकामचे अधिकारी तसेच या पुलाचे ठेकेदार उपस्थित होते. पुलाची पाहणी केल्यानंतर माजी खासदार निलेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व पुलाचे ठेकेदार यांना चांगलेच धारेवर धरले. पाच वर्षे तुम्ही काय करत होता. या पुलाचे काम पूर्ण का होत नाही. कारणे आणि सबब सांगू नका. काम पूर्ण झाले पाहिजे. स्थानिक आमदार व खासदार तुमचे लाड पुरवतील पण मी ऐकून घेणार नाही ही जनता आमची आहे. ग्रामस्थांची हेळसांड थांबली पाहिजे. या अर्धवट पुलाच्या कामामुळे शाळकरी मुलांना चार ते पाच किलोमीटर फिरून शाळेत जावं लागत आहे. तुम्हाला त्याची काय लाज वाटते की नाही? हे पुल कधी पूर्ण होणार ते लेखी स्वरूपात द्या जर त्या कालावधीत हे पुल पूर्ण झाले नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने काम करू, असे त्यांनी सांगितले.

यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी आपल्या व्यथा मांडल्या. ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कोणालाही जुमानत नाही. गेली पाच वर्ष या पुलाचे काम केले जात आहे. अर्धवट असलेल्या पुलामुळे आम्हा ग्रामस्थांना तसेच आमच्या शाळकरी मुलांना त्रास सहन करावा लागत आहे, असे त्यांनी सांगितले तर यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांनी येत्या मे महिन्यापर्यंत या पुलाचे काम पूर्णत्वास जाईल असे सांगितले. यावेळी तालुकाध्यक्ष दादा साईल, जिल्हा सदस्य आनंद शिरवलकर, माजी समाज कल्याण सभापती अंकुश जाधव, विनायक अणावकर, नारायण गावडे, श्री कांदळगावकर, भाजपचे कुडाळ शहराध्यक्ष राकेश कांदे, भाजप नगरपंचायतीचे गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक अभी गावडे, बांव माजी सरपंच नागेश परब तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Recent Posts

SRH vs MI, IPL 2025: सनरायजर्स हैदराबादचे मुंबईला १४४ धावांचे आव्हान, क्लासेनची जबरदस्त खेळी

हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स…

14 minutes ago

पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार!

राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती नवी दिल्ली : मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील…

19 minutes ago

IPL सामन्यात काळी पट्टी बांधून उतरले खेळाडू, चिअरलीडर्स गायब…पहलगाम हल्ल्यानंतर झाले हे बदल

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…

27 minutes ago

अधिकाऱ्यांनी पूर्व परवानगीशिवाय कार्यालय सोडल्यास होणार निलंबनाची कारवाई

मुख्यालयातील उपस्थितीचे महसूल विभागाचे काटेकोर आदेश मुंबई: महसूल विभाग जनतेच्या सेवेसाठी असून जनसेवेत कसूर करणाऱ्या…

34 minutes ago

दहशतवादी हल्ल्याने महाराष्ट्रावर पसरली शोककळा

डोंबिवलीवर शोकसागराचे सावट, पनवेलमध्ये दु:खाचा कल्लोळ तर पुण्यात अश्रूंच्या धारा मुंबई : काश्मीरच्या पहलगाम येथील…

44 minutes ago

CT Scan मुळे कर्करोग होऊ शकतो का? अमेरिकेतील एका नवीन अभ्यासात खुलासा

CT Scan Caused Cancer: सीटी स्कॅन हा शब्द प्रत्येकांनी कधी ना कधी ऐकला असेल, वेगवेगळ्या…

49 minutes ago