महिन्याभरापूर्वी अलर्ट देऊनही दहशतवादी मुंबईत घुसलाच

मुंबई: राष्ट्रीय तपास यंत्रणेने एका महिन्यापूर्वी अलर्ट जारी करुनही एक दहशतवादी मुंबईच घुसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे झोपलेल्या पोलिसांची आता चांगलीच पळापळ झाली आहे. दरम्यान, या दहशतवाद्याचे नाव सरफराज मेमन असल्याचे समोर आले आहे. आता पुन्हा एनआयएने पाठवलेल्या इ-मेलमध्ये मुंबई पोलिसांना २४ तास अलर्ट राहण्याचे निर्देश दिले आहेत.



चीन व हाँगकाँगमध्ये ट्रेनिंग


या ई-मेलमध्ये दिलेल्या माहितीत, सरफराज मध्य प्रदेशाचा असल्याचं म्हटलं आहे. त्याने चीन व हाँगकाँगमध्ये ट्रेनिंग घेतली असल्याचे समोर येत आहे. एनआयएने मुंबई पोलिसांना सरफराजचे आधार कार्ड, चालक परवाना व पासपोर्टही मेल केला आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणी इंदूर पोलिसांशीही संपर्क साधला आहे.



काही दिवसांपूर्वीच धमकीचा ईमेल


फेब्रुवारी महिन्याच्या प्रारंभीच एनआयएला एका अज्ञात व्यक्तीने ईमेल पाठवला होता. त्यात त्याने आपण तालिबानी असल्याचा दावा केला होता. तसेच मुंबईत अतिरेकी हल्ला करण्याची धमकीही दिली होती. एनआयएने या प्रकरणी मुंबई पोलिसांना संपूर्ण घटनाक्रम समजावून सांगितला होता. त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांत अलर्ट जारी करण्यात आला होता.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.