कोकणच्या लाल मातीत पिकतेय लालबूंद, रसरशीत स्ट्रॉबेरी

  153

सिंधुदुर्ग: कोकणात तुम्ही भात पिकताना पाहिलं असेल. काजू, कोकम, आंबे म्हणजे कोकणचं वैभव पण पण कोकणात स्ट्रॉबेरी शेती शक्य आहे का? तर याचं उत्तर हो आहे.


लालबुंद, रसरशीत स्ट्रॉबेरी म्हटलं की आपल्याला आठवत ते महाबळेश्वर. गेल्या तीन वर्षांपासून तळकोकणात म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील सह्याद्रीच्या पायथ्याशी घारपी गावात स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतलं जांत आहे. या शेतकऱ्याने तळकोकणच्या लाल मातीत स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे.


जोश कर्णाई असं या शेतकऱ्याचं नवा. मूळचे केरळचे असलेले कर्णाई हे कामानिमित्त मुंबईत आले होते. मुंबईत स्थायिक झाल्यानंतर त्यांनी तळकोकणात शेती घेतली. या शेतीत ते अनेक वेगवेगळे प्रयोग करत आहेत. त्यात त्यांनी सध्या स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतलं आहे.


जोश कर्णाई हे अर्धा एकर जागेवर गेली तीन वर्ष स्ट्रॉबेरीचं उत्पन्न घेत आहेत. दिवसाआड त्यांना २५ किलो उत्पन्न मिळतं. सुरुवातीला त्यांना ७०० रुपये प्रति किलो दर मिळाला. सध्या हा दर २५० रुपये आहे. स्थानिक सावंतवाडी बाजारपेठेसह गोवा राज्यात मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरीला मागणी आहे.


कोकणातील उष्ण आणि दमट वातावरणात स्ट्रॉबेरीची शेती शक्य झाली आहे कारण, घारपी गावातील वातावरण स्ट्रॉबेरी शेतीसाठी पूरक आहे. हनुमंत गडाच्या अगदी पायथ्याशी स्ट्रॉबेरीची ही शेती असल्याने पर्यटक देखील या स्ट्रॉबेरीच्या शेतीला भेट देत स्ट्रॉबेरीची चव चाखतात.


या स्ट्रॉबेरीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सेंद्रिय पद्धतीने स्ट्रॉबेरी शेती केली जाते. त्यामुळे या स्ट्रॉबेरीला चव देखील चांगली आहे. अवघ्या सहा महिन्याच्या कालावधीचं हे स्ट्रॉबेरीच उत्पादन घेतलं जात अल्याची माहिती शेतकरी जोश कर्णाई यांनी दिली.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी

मुसळधार पावसामुळे दुचाकीस्वार गेला वाहून, एनडीआरएफकडून तरुणाचा शोध सुरु...

सावंतवाडी : सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साठल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा

Ganesh Festival 2025 : चला गणपतीक गावाक जाऊचा असा; नियमित गाड्यांचे आरक्षण सुरु होतला…

कोकण मार्गावरील नियमित गाड्यांच्या आरक्षणाचे वेळापत्रक जारी झाल्याने रेल्वेच्या नियमांप्रमाणे ६० दिवसांचे

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सेवानिवृत्त युद्धनौकेचे नवे स्वरूप, सागरी संवर्धन व पर्यटनाला चालना  मुंबई: आयएनएस गुलदार या नौदलातून

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १७ तासांनंतर सुरू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) निवळी घाटात सीएनजी टँकर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण