नवी दिल्ली : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी गोदरेज अँड बॉइस कंपनीच्या विक्रोळी येथील भूखंडाचे संपादन करण्याच्या व त्याबदल्यात २६४ कोटी रुपये भरपाई देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या आदेशाविरोधात गोदरेज कंपनीने केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी या कंपनीने केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानेही शुक्रवारी फेटाळल्याने बुलेट टेन प्रकल्प पूर्णत्वाला जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ही आव्हान याचिका सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे सुनावणीसाठी आली होती. या खंडपीठाने सांगितले की, गोदरेज अँड बॉइस कंपनीचा भूखंड बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी सरकारने याआधीच संपादित केला असून, तिथे बांधकामही सुरू करण्यात आले आहे. भरपाईची रक्कम वाढवून द्यावी, अशी मागणी कंपनी सरकारकडे करू शकली असती.
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…