सुनावणीदरम्यान युक्तीवादातील तफावत समोर आल्याने सिब्बल अडचणीत

  98

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सलग दुसऱ्या दिवशी नियमीतपणे सुनावणी होत आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तीवाद केला जात आहे. दरम्यान, त्यांच्या युक्तिवादात तफावत समोर आल्याने ते अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकरिणीचे २०१९ चे मराठी पत्राचे वाचन करण्यात आले. या पत्रानुसार निर्णय घेण्याचे सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडे असल्याचे सरन्यायाधीशांनी टिपण्णी केली आहे.


एकनाथ शिंदे यांची गटनेते पदी कशी निवडणूक झाली याचा ठराव स्वतः सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी मराठीतून वाचला. यावेळी, ठराव वाचल्यानंतर धनंजय चंद्रचुड म्हणाले, सिब्बल याच्यावर उद्धव ठाकरेंची सही नाही. याच्यावर ५६ आमदारांची सही आहे. म्हणजे एकनाथ शिंदेंना गटनेता म्हणून निवडण्याचा निर्णय आमदारांनी घेतला. उद्धव ठाकरेंनी नाही.


गेले सात महिने, एकनाथ शिंदें यांची गटनेतेपदी उद्धव ठाकरेंनी निवड केली होती असा दावा ठाकरे गट करत आहे. मात्र, आजच्या सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलेल्या टिपण्णीवरुन असे लक्षात येते की, शिंदेंची गटनेतेपदी निवड ५६ आमदारांनी केली आहे.


युक्तीवादा दरम्यान, शिवसेनेची निवडणूक २३ जानेवारी २०१८ मध्ये झाली होती. तर राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकही २०१८ मध्ये झाली होती. तेव्हा एकनाथ शिंदे हे शिवसेनेत चौथ्या क्रमांकाचे नेते होते. काहींची नेमणूक झाली काही निवडून आले, ही माहिती निवडणूक आयोगाला दिली होती. पण घटनाच मान्य नाही असे निवडणूक आयोग आता म्हणतेय, असे बोट सिब्बल यांनी ठेवले.


तसेच २५ नोव्हेंबर २०१९ मध्ये ठाकरे मुख्यमंत्री नाही तर पक्षाचे अध्यक्ष होते. त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळाले तरी ते पक्षाचे अध्यक्षच होते. २०१९ नंतर उद्धव ठाकरेंना सर्वाधिकार देण्यात आले. याच बैठकीत एकनाथ शिंदेंची गटनेता म्हणून निवड. याच बैठकीत सुनील प्रभुंची प्रतोद म्हणून निवड आमदार पक्षचिन्हाच्या जोरावर निवडून येतात, असे सिब्बल यांनी पटवून देण्याचा प्रयत्न केला.

Comments
Add Comment

PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेत आता मिळणार इतके व्याज, सरकारने केली घोषणा

नवी दिल्ली: भारत सरकारने स्मॉल सेव्हिंग स्कीम्सवरील व्याजदर कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेत आतापर्यंत

'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारताची गरुडझेप : आता पाकिस्तान-चीनच्या प्रत्येक हालचालीवर करडी नजर!

नवी दिल्ली: 'ऑपरेशन सिंदूर'मधील यशानंतर भारताने आता मोठी कंबर कसली आहे! शत्रू देशांच्या मनात धडकी भरेल अशी एक

भारत-पाक सीमेवर आढळले दोन मृतदेह, पाकिस्तानी सिम-ओळखपत्रे जप्त

जयपूर: राजस्थानमधील जैसलमेर येथे भारत-पाकिस्तान सीमेवर एक अल्पवयीन मुलगी आणि एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

मोसमी पाऊस पडण्यास अनुकूल वातावरण, पुढील पाच दिवस पावसाचे

मुंबई (प्रतिनिधी) : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी रविवारी, २९ जून रोजी संपूर्ण देश व्यापला. साधारणपणे ८ जुलै रोजी मोसमी

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, आता ४ नव्हे तर रेल्वे सुटण्याच्या इतके तास आधी तयार होणार चार्ट

नवी दिल्ली: तुम्ही जर रेल्वेमधून प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता तिकीटिंग आणि रिझर्व्हेशन

Emergency : आणीबाणी लादणाऱ्यांनी संविधानाची हत्या केली - पंतप्रधान

नवी दिल्ली : देशावर आणीबाणी लादण्यात आली, त्या घटनेला काही दिवसांपूर्वी पन्नास वर्षे पूर्ण झाली. आपण