सासूच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या

कोटा: कोटा येथे सासूच्या जाचाला कंटाळून जावयाने गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले. आत्महत्येनंतर तीन दिवसांनी तरुणाच्या पर्समधून सापडलेल्या सुसाईड नोटवरून या प्रकरणातील धक्कादायक खुलासे झाले आहेत. मृत चेतन जांगीड हा केशवपुरा सेक्टरचा रहिवासी होता. चेतनने चार दिवसांपूर्वी स्वत:च्या खोलीत पंख्याला गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले होते. सासरच्या मंडळींना मारहाण करून लाखो रुपयांची मागणी केल्याचा गंभीर आरोप करत मृताच्या नातेवाइकांनी न्यायाची याचना केली आहे.


चेतनने आपल्या भावना सुसाईड नोटमध्ये लिहून सासूला तुरुंगात पाठवण्याबाबत आणि त्याच्या संपत्तीतील हिस्सा पत्नीला न देण्याबाबत लिहिले आहे. चेतनने सुसाईड नोटमध्ये लिहिले की, 'मी आणि पूजा दोघेही एकत्र राहत होतो. माझे सासु आणि सासरे माझ्याकडे पैशाची मागणी करायचे. मी माझ्या मुलांचे पोट भरण्यासाठी कष्ट करायचो.


माझ्या सासु-सासऱ्यांनी पूजाचे दागिनेही विकले. ते माझ्या मुलांना स्वत: जवळ ठेवून दोन लाख द्या आणि मुलांना घेऊन जा, असं धमकवायचे. मी त्यांना दोनदा आणायला गेलो असता त्यांनी मला बेदम मारहाण केली. ते मला जबरदस्ती करत होते की तू तुझ्या आई-वडिलांच्या घराचा हिस्सा माग. माझ्या सासूबाईंचे टोमणे ऐकून मी हैराण होतो.



सासू मला मारण्यासाठी भूत आणायची


चेतनने सुसाईड नोटमध्ये असेही लिहिले की, मला मारण्यासाठी माझी सासू काळ्या जादूचा आधार घेत भूत आणत असे. मी माझ्या दोन मुलांशी आणि पूजाशी बोलण्याचा प्रयत्न करायचो. पुजाला मी तुझ्या आईकडून दागिने घेऊन ये असे सांगितले. पण ती तिच्या आईने दागिने तिचे विकले आहेत, असे सांगायची.
चेतनने १५ फेब्रुवारी रोजी गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले होते. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास महावीर नगर पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च