एनआयएची तीन राज्यांत ६० ठिकाणी छापेमारी

नवी दिल्ली : कोईम्बतूर कार बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) सक्रिय झाली असून एनआयएच्या पथकाने तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळमधील ६० ठिकाणी छापे टाकत कसून चौकशी सुरु केली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, एनआयए अधिकाऱ्यांनी प्रतिबंधित दहशतवादी संघटना आयसिसशी संबंधित संशयितांना पकडण्यासाठी हा छापा टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.


गेल्या वर्षी दिवाळीच्या एक दिवस आधी कोईम्बतूरच्या संगमेश्वर मंदिरासमोर कारमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला होता. या स्फोटात २५ वर्षीय जेमशा मुबीनचा मृत्यू झाला. जेमशा त्याच्या इतर साथीदारांसह दक्षिण भारतातील अनेक भागात बॉम्बस्फोटांचा कट रचत असल्याचे तपासात समोर आले आहे.


पोलिसांना जेमशाच्या घरात स्फोटकांचा मोठा साठा सापडला होता. झडती दरम्यान कोईम्बतूर रेल्वे स्टेशन, शहर पोलीस आयुक्त कार्यालय, कोईम्बतूर जिल्हाधिकारी कार्यालय, रेसकोर्स आणि व्हिक्टोरिया हॉलचे नकाशेही सापडले. जेमशा आयसिसच्या संपर्कात असल्याचेही पोलिसांनी सांगितले.


तसेच कर्नाटकातील मंगळुरूमध्ये गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ऑटो रिक्षात प्रेशर कुकर बॉम्बचा स्फोट झाला होता. या स्फोटात आरोपी मोहम्मद शारिक हा जखमी झाला. अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी शारिक बराच काळ फरार होता.

Comments
Add Comment

Google's doodle : गुगलचं विशेष ‘पाय डे’ डूडल; गणितातील प्रसिद्ध स्थिरांकाला गुगलकडून अनोखा सलाम

मुंबई : गुगलने जगभरातील गणितप्रेमींसाठी १४ मार्च २०२६ रोजी खास डूडल सादर करून ‘पाय डे’ साजरा केला. या विशेष

Operation White Hammer : आंध्र प्रदेशात ४७ कोटींचे अंमली पदार्थ जप्त; दोघांना अटक

सिंथेटिक ड्रग्जच्या बेकायदेशीर उत्पादनाविरोधात महत्त्वपूर्ण कारवाई करत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय)

फास्टॅग वार्षिक पास १ एप्रिलपासून महाग होणार

नवी दिल्ली : पुढील महिन्यापासून म्हणजेच १ एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना थोडा

युद्धामुळे महागणार विमान प्रवास?

नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील तणावाचे चटके आता विमान प्रवासालाही बसणार आहेत. इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात

Dharmantar Bandi Kayda : सावधान! बळजबरीने किंवा आमिषाने धर्मांतर केल्यास...राज्य सरकारचा धर्मांतर बंदी कायद्याचा नवा प्रस्ताव सादर

मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील सक्तीच्या आणि फसव्या धर्मांतरांना लगाम घालण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे.

भारताच्या जहाजांना धोका नाही

इराणकडून मैत्रीचा हात पुढे नवी दिल्ली : पश्चिम आशियात इराण-इस्रायल तणावामुळे जागतिक सागरी व्यापार धोक्यात आला