'अपयशातून यशाचा राजमार्ग'

अलिबाग (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांनी प्रत्येक स्पर्धेत सहभागी झाले पाहिजे. क्रीडा क्षेत्रात कामगिरी करीत असताना कोणी जिंकेल, कोणी हरेल; पण हताश होऊ नका. कारण प्रत्येक अपयश आपल्याला नवीन गोष्टी शिकवून जाते. काय चुका करू नयेत हे शिकवते. अपयशातूनच यशाचा राजमार्ग मिळतो. तुम्ही फक्त खेळांचा आनंद घ्या, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले. पीएनपी एज्युकेशन सोसायटीची सायरस पुनावाला सीबीएसई स्कूल नागाव येथे नुकतेच दोन दिवसीय स्पोर्ट्स डे, विज्ञान प्रदर्शन आणि बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.


पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, नृत्य दिग्दर्शक जयेश पाटील, डॉ. चंद्रकांत वाजे, अॅड. भूमी कोळी, नागावचे सरपंच निखिल मयेकर, सदस्या हर्षदा मयेकर, विशेष कार्यकारी अधिकारी संजय मिर्जी, मुख्याध्यापिका रसना व्यास आणि इतर मान्यवर, विद्यार्थी व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पालक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पीएनपी सायरस पुनावाला शाळेचा परिसर, शाळेची इमारत, क्रीडा सुविधा अत्यंत सुंदर आहेत. संपूर्ण रायगड जिल्ह्यात अशी सुंदर व परिपूर्ण शाळा नसेल. त्याचप्रमाणे विद्यार्थी देखील अत्यंत तल्लख बुद्धीचे आहेत. ही शाळा, या शाळेतील सुविधा बघून फार आनंद झाला असल्याचेही त्यांनी सांगितले. समारोपप्रसंगी नागावचे सरपंच निखिल मयेकर, सदस्या हर्षदा मयेकर, डॉ. राजेंद्र चांदोरकर, डॉ. राजश्री चांदोरकर, डॉ. गणेश गवळी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी दोन दिवसीय विविध क्रिडा स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षिसे देवून गौरविण्यात आले. पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांनी सांगितले की, स्वर्गीय प्रभाकर पाटील यांच्या प्रेरणेने शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात कार्यरत आहोत. या क्षेत्रात अजून खूप वाटचाल करायची आहे. ही शाळा खरतर सर्वांची म्हणजेच पालकांची आणि कर्मचाऱ्यांची आहे. त्यांच्यामुळे शाळेचे चांगले अस्तित्व आहे. खेळ म्हंटले की, हरणे-जिंकणे आलेच. मात्र तुम्ही दडपण न घेता त्या क्षणाचा आनंद घ्या, असे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

उद्यापर्यंत ब्लॉक रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण

Eknath Shinde : शिंदेंकडून निलेश राणेंचं तोंडभरून कौतुक! "इलाका किसी का भी हो, धमाका निलेश राणेच करणार"; मालवण हा सेनेचाच बालेकिल्ला

मालवणमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांचे

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे धुक्यामुळे भीषण अपघात

शिवशाही बस, ट्रकमध्ये धडक; १ ठार, ११ जखमी प्रमोद जाधव माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे.

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक