अवघ्या १० गुंठ्यात एका महिन्यात ५०० किलो कलिंगड उत्पादन

कलिंगडासह काकडी, वांगी, पालेभाजीतून साधला आर्थिक उन्नतीचा मार्ग


देवरुख : कृषी क्षेत्रात पदवी घेतल्यानंतर तिचा उपयोग नोकरीसाठी न करता स्वतःच्याच शेतात निरनिराळे प्रयोग करत आहे. तो म्हणजे लोवलेतील युवक शुभम दोरखडे. या तरुणाने एकाच वेळी ५०० किलो मेलोडी या जातीचे कलिंगड उत्पादन घेतले आहे. कलिंगडसह काकडी, वांगी इत्यादी पालेभाजीचे उत्पादन घेतले आहे.


शुभमने दापोली कृषी विद्यापीठातून कृषी पदवी प्राप्त केली. त्यानंतर तो स्वमालकीच्या जागेत गेली पाच सहा वर्षे निरनिराळे प्रयोग करत आहे. यंदा त्याने १० गुंठे क्षेत्रात कलिंगड लागवड केली आहे. ३ टप्प्यात केलेल्या लागवडीच्या पहिल्या टप्प्यात त्याने तब्बल ५०० किलोचे कलिंगड उत्पादन घेतले आहे. अजुन दोन उत्पादने आहेत ती पुढच्या दोन महिन्यांत पूर्ण होतील, असा विश्वास शुभमला आहे.


हे सर्व पीक घेत असताना तो रासायनिक खतांचा वापर न करता गांडूळ खत, वर्मी खत अशा नैसर्गिक खतांचा वापर करत आहे. शुभमने रस्त्यालगत घर असल्याने तिथेच स्टॉल उभारून तिथेच कलिंगड आणि भाजी विक्री सुरू केली आहे.


त्याच्या या प्रयत्नांना आई-वडील आणि बहिणीने मोलाची साथ दिली आहे. आपल्याकडे कलिंगड आणि काकडी यांना मागणी खूप आहे.त्यामुळे दररोज दोन हजार रुपयांहून अधिक किमतीचे कलिंगड आणि भाजी विक्री होते. कृषीच्या शिक्षणाचा उपयोग अर्थार्जनासाठी केला आणि स्वतःच्या मालकीची जमीन असल्याने ती लागवडीसाठी उपयुक्त असल्याने तिचा वापर करून घेत आर्थिक प्रगती साधली असल्याचे मत तरुण शेतकरी शुभम दोरखडे याने व्यक्त केले.

Comments
Add Comment

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

Narayan Rane : "आमच्यात कटुता असली तरी जिव्हाळा कायम!" भास्कर जाधवांनी व्यक्त केली राणे साहेबांबद्दलची कृतज्ञता;

'त्या' घटनेनंतर जुन्या आठवणींना उजाळा चिपळूण : राजकारणात एकमेकांवर तुटून पडणारे नेते, वैयक्तिक आयुष्यात

फोंडाघाटचा ‘किऱ्याचा आंबा’ होणार जमीनदोस्त

कणकवली : फोंडाघाट, हवेलीनगर येथील शेकडो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक अधिष्ठान आणि मार्गदर्शक आख्यायिका, तसेच

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

उद्यापर्यंत ब्लॉक रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण