वंदे भारत ट्रेन म्हणजे आधुनिक भारताचा अभिमान

मुंबई: वंदे भारत ट्रेन म्हणजे आजच्या आधुनिक भारताचा अभिमान आहे. आतापर्यंत १० वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे देशभरात सुरू झाल्या आहेत. एकूण १७ राज्यातील १०८ जिल्हे या ट्रेननी जोडले गेले आहेत, या शब्दांत वंदे भारत एक्सप्रेसच्या लोकार्पण सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईवासियांना संबोधित केले.


पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. ते म्हणाले, रेल्वेच्या क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे. देशाला आज नववी आणि दहावी वंदे भारत ट्रेन समर्पित करताना मला अत्यंत आनंद होत आहे. आज देशात आधुनिक रेल्वे सुरु करण्यासोबतच मेट्रोचा विस्तार केला जात आहे. नवीन विमानतळे आणि बंदरे तयार केली जात आहेत. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सरकारतर्फे १० लाख कोटी रुपये पायाभूत सुविधांच्या (इंफ्रास्ट्रक्चर) विकासासाठी देण्यात आले आहेत.



पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मुंबईकरांना साद


पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, मला मुंबईच्या लोकांना विशेष माहिती द्यायची आहे की, अर्थसंकल्पात मध्यवर्गीयांना मजबूत करण्यात आलं आहे. पगारी लोकं असो की व्यापारी, दोघांनाही या अर्थसंकल्पाने खूश केलं आहे. यूपीए सरकार ज्या उत्पन्नावर २० टक्के कर घ्यायची ते भाजपा सरकारने करमुक्त केलं.

Comments
Add Comment

BMC APP : रस्त्यांवर खड्डे दिवसात का? करा माय बीएमसी मार्ग ऍपवर तक्रार

Mumbai : नागरिकांच्या तक्रारींचे जलद व प्रभावी निवारण करण्याच्या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेने या वर्षी ‘MyBMC MARG’

BMC : घरकाम करणाऱ्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी पालिकेचे 'अ‍ॅप' विकसित करा; महिला व बाल कल्याण समिती अध्यक्षांची मागणी

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेल्या महिला बचत गटातील सदस्यांना हक्काचा रोजगार

Industrial and commercial water usage : तरण तलाव, बांधकामांच्या ठिकाणच्या जलजोडण्या करणार खंडित

औद्योगिक व व्यावसायिक पाणी वापरात २० टक्के कपात मुंबई: पावसाळा लांबणीवर पडल्याने मुंबईत १५ मे २०२६ पासून १०

Commissioner Dr. Ashwini Joshi : अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांची बदली

प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांची नियुक्ती मुंबई  : मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांची

Water Shortage : पाणीटंचाईचे सावट गडद

जलतरण तलाव व बांधकामांच्या जलजोडण्या खंडित ; उद्योगांना २० टक्के कपात मुंबई : नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन

Alternative Transport Hub : बोरिवली स्थानकावरील गर्दी कमी होणार; कांदिवलीचा 'पर्यायी वाहतूक केंद्र' म्हणून विकास

मुंबई: पश्चिम रेल्वेवरील सर्वात वर्दळीचे स्थानक असलेल्या बोरिवली स्थानकावरील प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी