वंदे भारत ट्रेन म्हणजे आधुनिक भारताचा अभिमान

  103

मुंबई: वंदे भारत ट्रेन म्हणजे आजच्या आधुनिक भारताचा अभिमान आहे. आतापर्यंत १० वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे देशभरात सुरू झाल्या आहेत. एकूण १७ राज्यातील १०८ जिल्हे या ट्रेननी जोडले गेले आहेत, या शब्दांत वंदे भारत एक्सप्रेसच्या लोकार्पण सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईवासियांना संबोधित केले.


पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. ते म्हणाले, रेल्वेच्या क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे. देशाला आज नववी आणि दहावी वंदे भारत ट्रेन समर्पित करताना मला अत्यंत आनंद होत आहे. आज देशात आधुनिक रेल्वे सुरु करण्यासोबतच मेट्रोचा विस्तार केला जात आहे. नवीन विमानतळे आणि बंदरे तयार केली जात आहेत. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सरकारतर्फे १० लाख कोटी रुपये पायाभूत सुविधांच्या (इंफ्रास्ट्रक्चर) विकासासाठी देण्यात आले आहेत.



पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मुंबईकरांना साद


पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, मला मुंबईच्या लोकांना विशेष माहिती द्यायची आहे की, अर्थसंकल्पात मध्यवर्गीयांना मजबूत करण्यात आलं आहे. पगारी लोकं असो की व्यापारी, दोघांनाही या अर्थसंकल्पाने खूश केलं आहे. यूपीए सरकार ज्या उत्पन्नावर २० टक्के कर घ्यायची ते भाजपा सरकारने करमुक्त केलं.

Comments
Add Comment

पुढील दोन दिवस महत्त्वाचे! मुंबई, पुणे, दक्षिण कोकणसह राज्याच्या 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता, IMDचा ॲलर्ट

मुंबई : मुंबईमध्ये शुक्रवारी पावसाची उपस्थिती दिलासादायक होती. वीकेंडला एक-दोन ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

दिलासादायक! मुंबईत कोविड शून्य रुग्ण नोंद

कोविड सदृश्य अथवा तत्सम लक्षणे आढळल्यास कृपया योग्य ती काळजी घ्यावी : बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे

रविवारी रेल्वेचा मेगाब्लॉक

मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वेचा रविवार २९ जून २०२५ रोजी मेगाब्लॉक आहे. ब्लॉक काळात उपनगरीय रेल्वे सेवेच्या

कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडली लोडेड पिस्टल, खेळणी समजून मुलाने केला गोळीबार

12 वर्षांच्या मुलाकडून चुकून हवेत गोळीबार मुंबई:  दहिसर पूर्वच्या वैशाली नगर येथून एक धक्कादायक माहिती समोर येत

मध्य -हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेवर येत्या रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगा

अकरावी प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे पालक संतप्त; विद्यार्थी तणावाखाली

मुंबई : शिक्षण संचालनालयाने अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या दिवसापासून घातलेल्या गोधळानंतर पहिली यादीही