वंदे भारत ट्रेन म्हणजे आधुनिक भारताचा अभिमान

मुंबई: वंदे भारत ट्रेन म्हणजे आजच्या आधुनिक भारताचा अभिमान आहे. आतापर्यंत १० वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे देशभरात सुरू झाल्या आहेत. एकूण १७ राज्यातील १०८ जिल्हे या ट्रेननी जोडले गेले आहेत, या शब्दांत वंदे भारत एक्सप्रेसच्या लोकार्पण सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईवासियांना संबोधित केले.


पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. ते म्हणाले, रेल्वेच्या क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे. देशाला आज नववी आणि दहावी वंदे भारत ट्रेन समर्पित करताना मला अत्यंत आनंद होत आहे. आज देशात आधुनिक रेल्वे सुरु करण्यासोबतच मेट्रोचा विस्तार केला जात आहे. नवीन विमानतळे आणि बंदरे तयार केली जात आहेत. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सरकारतर्फे १० लाख कोटी रुपये पायाभूत सुविधांच्या (इंफ्रास्ट्रक्चर) विकासासाठी देण्यात आले आहेत.



पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मुंबईकरांना साद


पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, मला मुंबईच्या लोकांना विशेष माहिती द्यायची आहे की, अर्थसंकल्पात मध्यवर्गीयांना मजबूत करण्यात आलं आहे. पगारी लोकं असो की व्यापारी, दोघांनाही या अर्थसंकल्पाने खूश केलं आहे. यूपीए सरकार ज्या उत्पन्नावर २० टक्के कर घ्यायची ते भाजपा सरकारने करमुक्त केलं.

Comments
Add Comment

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला

मृणालताई गोरे विस्तारित उड्डाणपूलाच्या वाढीव खर्चावरून शंका; स्थायी समितीचे सदस्य करणार प्रत्यक्ष जागेची पाहणी

मुंबई: मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या राम मंदिर रोड ते गोरेगाव पश्चिम पर्यंतच्या रिलीफ रोड

सहली आडून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा घाट भाजपने उधळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांची राणीबाग आणि बोरीवली नॅशनल पार्कमध्ये सहल आयोजित करण्याचा

अखेर महापौर चषक स्पर्धा होणार; सन २०२६-२७ मध्ये होणाऱ्या महापौर चषक क्रीडा स्पर्धांसाठी पाच कोटी रुपये निधीची तरतूद

मुंबई: डिजिटल युगात मुले भ्रमणध्वनीभोवती गुरफटली आहेत. मुले मैदानी खेळ विसरली आहेत. मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ कमी

मुंबई अखंडपणे धावण्यामागे महिलांचे योगदान मोठे; 'सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार’ सोहळ्याप्रसंगी महापौरांचे वक्तव्य

मुंबई: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजातील अन्यायाविरोधात उभे राहत मुलींसाठी शिक्षणाचा मार्ग खुला