सिद्धीस इन्स्टिटयूट ऑफ फार्मसीचे विद्यार्थी महाराष्ट्रात प्रथम

  111

मुरबाड: मुरबाड मधील सिद्धीस इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी टेक्निकल इन्स्टिटयूटला महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळाला आहे. तब्बल ६ हजार प्रोजेक्ट्समधून त्यांची निवड करण्यात आली. मुंबईमध्ये वरळी एक्सिबिशन सेंटर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात हे पारितोषिक प्रदान करण्यात आले. बी. एस मार्शल फाउंडेशनचे संस्थापक बलदेवकृष्ण शर्मा, न्यूक्लियर सायंटिस्ट डॉ. अ. प. जयरामन, रोटरी क्लब वरळीचे अध्यक्ष. सचिन संघवी व आयसीटीचे माजी कुलगुरू जे. बी. जोशी, यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.


या महाविद्यालयातील विद्यार्थी प्राजक्ता गावडे, मानसी शेळके, राहुल विश्वकर्मा व पियुष यादव यांनी हा प्रोजेक्ट तयार केला होता. प्रथम पारितोषिक म्हणून सर्टिफिकेट, सन्मानचिन्ह व रुपये १ लाखाचे बक्षीस देण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रजनीकांत काकडे प्रा. मोहित जाधव उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांचे बापूसाहेब देशमुख सेवा प्रतिष्ठानचे चेअरमन संतोष अनंत देशमुख यांनी कौतुक केले आहे. महाविद्यालयात रिसर्च करणे हि काळाची गरज आहे, व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची क्षमता ओळखुन त्यांना योग्य तो मार्ग दाखवण्याचे काम प्राचार्य डॉ. रजनीकांत तु. काकडे सर करत आहेत. तसेच या प्राचार्य शोहेब शेख, प्राचार्य सचिन कोकाटे तसेच इतर सर्व प्राध्यापक वर्गाचेही योगदान लाभले.

Comments
Add Comment

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चीनमुळे रखडली; चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्या!

मुंबई : चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

उबाठा-मनसे एकत्र येण्याआधीच काँग्रेसचा महाआघाडीला झटका!

महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी मुंबई : हिंदी सक्तीच्या विषयावरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठा

मुंबईत मरीन ड्राईव्हपेक्षा मोठा समुद्री पदपथ तयार! कधी सुरु होणार?

या मार्गाला धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता असे नाव मुंबई : मुंबईकरांसाठी

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र