दि रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आग, सर्व कागदपत्रे जळाली

कर्जत: कर्जत शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पहिल्या मजल्यावर आग लागली. पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास शॉटसर्किटमुळे लागलेल्या या आगीत बँकेतील सर्व दस्तऐवज जळून खाक झाले आहेत. दरम्यान, आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.


या बँकेला पहाटे लागलेली आग तिथून जाणाऱ्या भाजीपाला विक्रेत्याच्या निदर्शनास आली. तात्काळ त्याने तेथील स्थानिक ग्रामस्थ यांना कळविले. ग्रामस्थ व कर्जत पोलीस यांच्या मदतीने पहाटे ५ वाजता अग्निशमन दलाच्या कर्जतच्या टीमला पाचारण केले.


आज बँक बंद असल्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी अन् मोठा अनर्थ टळला . यानंतर ही आग विझविण्याचे शर्थीचे पर्यंत सुरू करण्यात आले. ३ तासांच्या अथक परिश्रमानंतर लागलेली आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. या आगीत बँकेच्या सर्व कागदपत्रांसह इतर सर्व सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे समजते.


यावेळी स्थानिक ग्रामस्थांसह कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, बँक अधिकारी, कर्मचारी, अग्निशमन दलाची संपुर्ण टीम उपस्थित होती. सदरील लागलेल्या आगीत बँकेचा डेटा ३ ठिकाणी सुरक्षित असून बँकेचा विमा असल्याची माहिती बँक अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर बँकेचे सर्व व्यवहार येत्या चार दिवसात सुरळीत होतील. ग्राहकांनी घाबरण्याचे कारण नाही, असे बँकेचे संचालक राजेंद्र हजारे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

Narayan Rane : "आमच्यात कटुता असली तरी जिव्हाळा कायम!" भास्कर जाधवांनी व्यक्त केली राणे साहेबांबद्दलची कृतज्ञता;

'त्या' घटनेनंतर जुन्या आठवणींना उजाळा चिपळूण : राजकारणात एकमेकांवर तुटून पडणारे नेते, वैयक्तिक आयुष्यात

फोंडाघाटचा ‘किऱ्याचा आंबा’ होणार जमीनदोस्त

कणकवली : फोंडाघाट, हवेलीनगर येथील शेकडो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक अधिष्ठान आणि मार्गदर्शक आख्यायिका, तसेच

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

उद्यापर्यंत ब्लॉक रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण