शैलेश टिळक नाराज; कसबा पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट!

पुणे : मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कुटुंबातील सदस्यालाच उमेदवारी मिळेल अशी आशा होती. आम्ही पक्षाकडे तिकीटाची मागणीही केली होती. पण तिकीट देण्यात आले नाही. का दिले नाही माहीत नाही? अशी भावूक प्रतिक्रिया व्यक्त करताना मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांचा कंठ दाटून आला होता. त्यांच्या डोळ्यात पाणीही आले होते. शैलेश टिळक नाराज असल्याने कसबा पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.


हेमंत रासने यांना कसब्यातून भाजपकडून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्यानंतर शैलेश टिळक यासंबंधी बोलताना म्हणाले की, पक्षाकडे उमेदवारी मागितली होती परंतु वेगळा निर्णय घेतला गेला. पक्षाच्या या निर्णयावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते पुढे म्हणाले की, पक्षाने घेतलेला निर्णय मान्य आहे परंतु मुक्ता टिळक यांच्या कामावर अन्याय झाला आहे. त्यामुळे मनात खंत आहे. कोणतीही पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर साधारण एखाद्याच्या घरातील व्यक्तीचे निधन झाले असेल तर त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला नैसर्गिकपणे उमेदवारी दिली जाते. मीही उमेदवारीची मागणी केली होती, असे शैलेश टिळक म्हणाले.


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काल चर्चा झाली. उमेदवारी देण्याबाबत अजून काही निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले होते. दिल्लीतून निर्णय होईल असे त्यांनी सांगितले होते. आज उद्या निर्णय होईल असेही ते म्हणाले होते. तसेच ताई गेल्यानंतर घरी यायचे राहिले होते. त्यामुळेही फडणवीस काल घरी आले होते. काल त्यांनी कोणतेही संकेत दिले नव्हते, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच आम्ही पक्षासोबतच राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.


मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर भाजपकडून टिळक कुटुंबाबाहेरील उमेदवार देण्यात आला आहे. हेमंत रासने हे स्थायी समितीचे तीन वेळा अध्यक्ष राहिले आहेत.


आता हेमंत रासने यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी शाळांना नोंदणी करण्याचे आवाहन

मुंबई : राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (विजाभज), इतर मागास वर्ग (इमाव) आणि विशेष मागास प्रवर्ग (विमाप्र) या

मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, तत्काळ तिकीट बुकिंगसाठी नवे नियम

पुणे : तत्काळ तिकीट बुकिंगमधील गैरप्रकार रोखण्यासाठी मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांसाठी

शेतकऱ्यांना पीक विम्याचे हेक्टरी १७ हजार ५०० रुपये मिळणार; पण काय सांगतो नियम आणि शेतकऱ्यांना मिळणार किती फायदा ?

पुणे : यंदाच्या खरीप हंगामात राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी पिके

Pench : पेंच व्याघ्र प्रकल्पात आता 'सोलर बोट'ची सफारी लवकरचं पर्यटकांच्या सेवेत!

किरंगीसरा ते नवेगाव खैरी दरम्यान धावणार पर्यावरणपूरक 'सोलर बोट' पेंच : निसर्गप्रेमी आणि वन्यजीव पर्यटकांसाठी एक

शिल्पांच्या माध्यमातून राम सुतारांची कला शतकानुशतके स्मरणात राहील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: ज्येष्ठ शिल्पकार महाराष्ट्रभूषण, डॉ. राम सुतार यांचे बुधवारी (१७ डिसेंबर) रात्री निधन झाले. त्यांच्या

शिल्पकलेतील भीष्माचार्य काळाच्या पडद्याआड - उपमुख्यमंत्री अजित पवार

भारतीय स्मारक शिल्पांना जागतिक पातळीवर ओळख मिळवून देणारा प्रतिभावान शिल्पकार गमावला - उपमुख्यमंत्री अजित