एसबीआय आणि एलआयसी बाबत काळजीचे कारण नाही

  97

अदानी प्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे स्पष्टीकरण


नवी दिल्ली : भारतीय बँकिंग प्रणाली चांगल्या स्थितीत आहे. लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. अदानी समूहातील स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) या दोन्हींची गुंतवणूक मर्यादेत आहे. तसेच बँक आणि एलआयसी दोन्ही फायद्यात आहेत आणि गुंतवणूकदारांना सध्या काळजी करण्याची गरज नाही, असे मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केले आहे.


हिंडेनबर्गच्या अहवालामुळे अदानी समूहाला मोठ्या प्रमाणात तोट्याचा सामना करावा लागत आहे. या अहवालामुळे गेल्या आठ दिवसांत अदानी समूहाच्या कंपन्यांचे सुमारे ७० टक्के नुकसान झाले आहे. त्याचबरोबर, कंपनीच्या मार्केट कॅपला ८ लाख ७६ हजार ५२४ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचवेळी अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या भारतीय बँका आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) यांनाही झटका बसला आहे. गुंतवणूकदारही चिंतेत आहेत. या मुद्द्यावरून संसदेत प्रचंड गदारोळ झाला. यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान अदानी प्रकरणी आपले मत व्यक्त केले आहे.


अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, माझ्या समजुतीनुसार, अदानी समूहातील एलआयसी आणि एसबीआयची गुंतवणूक ठरविण्यात आलेल्या मर्यादेतच आहे. यावेळी त्यांनी अदानी समूहातील एसबीआय आणि एलआयसीच्या गुंतवणुकीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांनाही स्पष्टपणे उत्तरे दिली.


त्या म्हणाल्या, की मी नमूद करू इच्छिते की एसबीआय आणि एलआयसी या दोघांनी त्यांची तपशीलवार माहिती संबंधित सीएमडी सोबत शेअर केली आहे. त्या अशाही म्हणाल्या की, भारतीय बँका आज एनपीएचे ओझे कमी करण्यात यशस्वी ठरल्या असून त्या मजबूत स्थितीत आहेत.


या मुलाखतीत त्यांनी असेही सांगितले की, एसबीआय आणि एलआयसीने आपण ओव्हरएक्सपोज केलेले नसल्याचे दोघांनी स्पष्ट केले आहे. दोघांच्या वतीने अदानी समूहाच्या शेअर्सचे एक्सपोजर मर्यादेत असल्याची माहिती सार्वजनिक करण्यात आली आहे. त्यांचे मूल्यांकन घसरल्यानंतरही ते फायद्यात आहेत. सीमारामण म्हणाल्या की, सध्या भारतीय बँकिंग व्यवस्थेने एनपीएचे ओझे कमी केले आहे. बँकेकडे मजबूत दुहेरी ताळेबंद आहे. एनपीए आणि रिकव्हरी स्थिती चांगली आहे. त्यामुळे घाबरून जाण्यासारखी कोणतीही परिस्थिती सध्यातरी दिसत नाही, असे त्या म्हणाल्या.

Comments
Add Comment

ऑपरेशन सिंदूरमुळे जगभरात वाढला भारतीय संरक्षण तंत्रज्ञानाचा डंका; ‘या’ देशाचा ‘आकाश’मध्ये रस

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू

PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेत आता मिळणार इतके व्याज, सरकारने केली घोषणा

नवी दिल्ली: भारत सरकारने स्मॉल सेव्हिंग स्कीम्सवरील व्याजदर कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेत आतापर्यंत

'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारताची गरुडझेप : आता पाकिस्तान-चीनच्या प्रत्येक हालचालीवर करडी नजर!

नवी दिल्ली: 'ऑपरेशन सिंदूर'मधील यशानंतर भारताने आता मोठी कंबर कसली आहे! शत्रू देशांच्या मनात धडकी भरेल अशी एक

भारत-पाक सीमेवर आढळले दोन मृतदेह, पाकिस्तानी सिम-ओळखपत्रे जप्त

जयपूर: राजस्थानमधील जैसलमेर येथे भारत-पाकिस्तान सीमेवर एक अल्पवयीन मुलगी आणि एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

मोसमी पाऊस पडण्यास अनुकूल वातावरण, पुढील पाच दिवस पावसाचे

मुंबई (प्रतिनिधी) : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी रविवारी, २९ जून रोजी संपूर्ण देश व्यापला. साधारणपणे ८ जुलै रोजी मोसमी

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, आता ४ नव्हे तर रेल्वे सुटण्याच्या इतके तास आधी तयार होणार चार्ट

नवी दिल्ली: तुम्ही जर रेल्वेमधून प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता तिकीटिंग आणि रिझर्व्हेशन