पीएसोबत गेलेले आमदार राजन साळवी पडले तोंडघशी

  138

मुंबई: ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार आणि उपनेते राजन साळवी यांचा पीए सुभाष मालप यांची लाचलूचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी सुरु झाली आहे. या चौकशीला पीए मालप यांच्यासोबत गेलेल्या आमदार राजन साळवी यांच्यावर मात्र, तोंडघशी पडण्याची वेळ आली.


राजन साळवी यांच्या पीएला रायगड लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचाची नोटीस आली होती. २ फेब्रुवारीला होणाऱ्या चौकशीसाठी ते गैरहजर राहिल होते. आज त्यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात सकाळी ११ वाजता हजेरी लावली. त्यावेळी राजन साळवीही त्यांच्यासोबत उपस्थित होते. पण फक्त पीए सुभाष मालप यांनाच आत चौकशीसाठी बोलवण्यात आले.


राजन साळवी हे त्यांच्या मालमत्ता वाढीसंदर्भातील प्रकरणावरुन सध्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या रडारवर आहेत. याआधीही राजन साळवींनी दोन वेळा लाचलूचपत विभागाच्या कार्यालयात मालमत्ते संदर्भात चौकशीसाठी हजेरी लावली होती.


यापूर्वी कोकणातील ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना नोटीस बजावण्यात आलेली होती. त्यानंतर आता साळवी यांना नोटीस बजावण्यात आली असून, तेही आता चौकशीच्या फेऱ्यात आले आहेत.

Comments
Add Comment

Red Soil Stories चे सुप्रसिद्ध यूट्यूबर शिरीष गवस यांचं निधन, वयाच्या ३३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोकणातील खाद्यसंस्कृती यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे सुप्रसिद्ध Red Soil Stories चे युट्युबर

गणेशभक्तांचा रेल्वे प्रवास अधिक सुखकर करा!

खा. नारायण राणे यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन विशेष गाड्या,अधिकचे कोच जोडण्याची केली मागणी नवी दिल्ली :

सिंधुदुर्गमध्ये महाराष्ट्राचा पहिला काचेचा पूल सज्ज! नापणे धबधब्यावर पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण, कोकण पर्यटनाला नवी झळाळी

सिंधुदुर्ग: कोकणच्या निसर्गरम्य सिंधुदुर्ग जिल्ह्यात, पर्यटनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे एक महत्त्वाचे

अभय योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा

आयुक्त मंगेश चितळे यांचे आवाहन पनवेल : मालमत्ता करांवरील शास्तीमध्ये सवलत देत पनवेल महापालिकेने दिनांक १८ जुलै

Reservation Chart : आता ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी पाहायला मिळणार आरक्षण चार्ट, 'या' दिवसापासून सेवा सुरूवात

मुंबई : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा देण्यासाठी आणि त्यांचा प्रवास अधिक चांगल्या पद्धतीने

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी