पीएसोबत गेलेले आमदार राजन साळवी पडले तोंडघशी

मुंबई: ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार आणि उपनेते राजन साळवी यांचा पीए सुभाष मालप यांची लाचलूचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी सुरु झाली आहे. या चौकशीला पीए मालप यांच्यासोबत गेलेल्या आमदार राजन साळवी यांच्यावर मात्र, तोंडघशी पडण्याची वेळ आली.


राजन साळवी यांच्या पीएला रायगड लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचाची नोटीस आली होती. २ फेब्रुवारीला होणाऱ्या चौकशीसाठी ते गैरहजर राहिल होते. आज त्यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात सकाळी ११ वाजता हजेरी लावली. त्यावेळी राजन साळवीही त्यांच्यासोबत उपस्थित होते. पण फक्त पीए सुभाष मालप यांनाच आत चौकशीसाठी बोलवण्यात आले.


राजन साळवी हे त्यांच्या मालमत्ता वाढीसंदर्भातील प्रकरणावरुन सध्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या रडारवर आहेत. याआधीही राजन साळवींनी दोन वेळा लाचलूचपत विभागाच्या कार्यालयात मालमत्ते संदर्भात चौकशीसाठी हजेरी लावली होती.


यापूर्वी कोकणातील ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना नोटीस बजावण्यात आलेली होती. त्यानंतर आता साळवी यांना नोटीस बजावण्यात आली असून, तेही आता चौकशीच्या फेऱ्यात आले आहेत.

Comments
Add Comment

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

Narayan Rane : "आमच्यात कटुता असली तरी जिव्हाळा कायम!" भास्कर जाधवांनी व्यक्त केली राणे साहेबांबद्दलची कृतज्ञता;

'त्या' घटनेनंतर जुन्या आठवणींना उजाळा चिपळूण : राजकारणात एकमेकांवर तुटून पडणारे नेते, वैयक्तिक आयुष्यात

फोंडाघाटचा ‘किऱ्याचा आंबा’ होणार जमीनदोस्त

कणकवली : फोंडाघाट, हवेलीनगर येथील शेकडो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक अधिष्ठान आणि मार्गदर्शक आख्यायिका, तसेच

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

उद्यापर्यंत ब्लॉक रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण