साखर कारखाना भ्रष्टाचार प्रकरणी पालकमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

मालेगाव (प्रतिनिधी ): गिरणा बचाव समितीच्या नावाखाली विद्यमान पालकमंत्र्यांनी नाशिक जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांची फसवणूक केली असून गिरणा मोसम शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लि. कंपनी स्थापन करून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आाला आहे. याप्रकरणी पालकमंत्री दादा भुसे यांची चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन अपर जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.


दाभाडी येथील अवसायनात आलेला गिरणा साखर कारखाना वाचवण्याचे नावाखाली गिरणा बचाव समितीच्या माध्यमातून विद्यमान पालकमंत्री भुसे यांनी गिरणा शुगर ॲग्रो ॲण्ड अलाइड इंडस्ट्रीज लि.हि कंपनी स्थापन केली. नाशिक जिल्ह्यातील हजारो शेतकरी बांधवांकडून प्रत्येकी हजार-हजार याप्रमाणे कोट्यावधी रुपये जमा केले. आणि फक्त कंपनीचे ४७ मुख्य भागधारक दाखवुन त्यांचेकडून १६ कोटी २१ लाख ८ हजार ८०० रुपयांचे भागभांडवल गोळा केल्याचे दर्शविले. मात्र पालकमंत्र्यांनी गिरणा सहकारी साखर कारखाना तर वाचवलाच नाही, उलट शेतकरी बांधवांची व मुख्य भागधारकांची कोट्यावधी रुपयांची आर्थिक फसवणुक केली. म्हणून त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.


येत्या १० दिवसात या प्रकरणाची चौकशी करून पालकमंत्र्यांवर गुन्हा दाखल करावा, फसवणूक झालेल्या शेतकरी बांधवांना आणि कपंनीच्या भागधारकांना त्यांचे पैसे व्याजासकट परत मिळवून द्यावेत. अन्यथा पालकमंत्री भुसे यांच्या निवासस्थानी फसगत झालेल्या शेतकरी बांधवांसह जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

CH. SAMBHAJINAGAR : MGM Hospital परिसरात नायजेरियन तरुणांकडून महिलेची छेडछाड आणि मारहाण

छत्रपती संभाजीनगर: शहरातील MGM Hospital परिसरात एका महिलेची छेडछाड व मारहाण झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या

Malegaon Namaz Pathan : मालेगाव मनपा कार्यालयात नमाज पठण, सात जणांवर गुन्हा दाखल

मालेगाव महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये नमाज पडल्याप्रकरणी सात जणांवरती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल

शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर

Air Ticket Refund Rules: विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; आतापासून तिकिट रद्द केल्यास परतावा..., जाणून घ्या नवीन नियम

मुंबई: देशातील विमान प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान

12th Exam Paper Leak : बारावी पेपरफुटी प्रकरणाला अंत नाहीच! रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रानंतर गणिताचा पेपरसुद्धा फुटला ?

नागपूर : बारावी पेपरफुटी प्रकणात नवनवीन धक्कादायक खुलासे सुरुच आहेत. १८ फेब्रुवारी रोजी पेपर फुटीचा पोलीस

बल्लारपूर येथे टिंबर म्युझियम व झायलरियम उभारणार; सुधीर मुनगंटीवारांच्या मागणीला वनमंत्र्यांचे ठाम आश्वासन

मुंबई: राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी