'पुनःधैर्य' योजनेला महिलांचा प्रतिसाद

भाईंदर : मीरा- भाईंदर शहरात गेल्या आठवड्यात सुरु झालेल्या 'पुनः धैर्य 'योजने मार्फत ५० पेक्षा अधिक महिला अर्जदारांचे समाधान करण्यात आले आहे. मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील मागच्या वर्षभरातील महिलांशी संबंधित गुन्ह्यांच्या आकडेवारीचे प्रमाण अधिक असल्याने पोलीस आयुक्तालयाकडून आता महिलांसाठी दर शनिवारी 'पुनःधैर्य ' योजना राबवण्यात येत आहे. आयुक्तलायकडून मीरा-भाईंदर शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये ही योजना राबवण्यात येत आहे.


महिलांवर होणारे अत्याचार तसेच इतर प्रकरणा बाबत पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात येते. त्यानंतर याप्रकरणातील दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येते. काही प्रकरणांमध्ये महिला तक्रारदार व समोरच्या व्यक्तीमध्ये तडजोड करुन पोलिसांकडून प्रकरण निकाली काढण्यात येते. अशा प्रकरणांमध्ये काही दिवसानंतर तक्रारदार महिलेला पुन्हा त्रास दिला जाण्याची शक्यता असल्याचे निदर्शनास आले आहे. हे प्रकार टाळण्यासाठी मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाकडून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. मीरा भाईंदर शहरातील काशिमिरा, मीरा रोड, भाईंदर, नवघर, उत्तन, नयानगर असशी ६ पोलिस स्थानकांत ही योजना सुरु करण्यात आली आहे.


पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची योजना राबवली जात आहे. महिलांशी संबंधित घडणारे गुन्हे रोखण्याच्या दृष्टीने ही योजना महत्वपूर्ण ठरणार असल्याचे सहायक पोलीस आयुक्त शशिकांत भोसले यांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment

Coastal Road : २४ तास खुला, पण 'सुरक्षित' नाही! वरळी-वांद्रे सी लिंक दरम्यान पथदिवे बंद; मुंबईकर प्रशासनावर नाराज

मुंबई : मुंबईतील कोस्टल रोड (Coastal Road) वाहतुकीसाठी २४ तास खुला (24 Hours Open) झाल्यानंतर त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो मार्गावर प्रवास होणार अधिक आरामदायी, सहा डब्यांच्या मेट्रोची तयारी

मुंबई : मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी! वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो मार्गावर आता प्रवास अधिक आरामदायी

मध्य रेल्वेच्या भांडुप स्थानकात नवा पादचारी पूल ; प्रवाशांची मोठी सोय,

मुंबई : भांडुप रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी एक मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे.

हरमनप्रीतची विनम्रता ; विश्वचषक स्वीकारण्याआधी कोच अमोल आणि जय शाह यांच्या पाया पडली

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने अखेर इतिहास रचत पहिल्यांदाच आयसीसी महिला विश्वचषक जिंकला आहे. या ऐतिहासिक

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय ! कणकवली सिंधुदुर्गला मिळणार ८ एक्सप्रेसचा थांबा

मुंबई : कोकणकरांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. कोकणात धावणाऱ्या आठ मेल एक्सप्रेस गाडयांना सिंधुदुर्ग आणि कणकवली

प्रभादेवी पुलामुळे बाधित होणाऱ्या ८३ कुटुंबांना मोक्याच्या ठिकाणी घरे

एमएमआरडीए ९८.५५ कोटी रुपये खर्च करणार मुंबई  : वरळी- शिवडी उन्नत मार्गाअंतर्गंत बांधण्यात येत असलेल्या