गटई कामगारांचा ‘रापी मोर्चा’ पोलिसांनी अडवला

ठाणे (प्रतिनिधी)- हुतात्मा दिनी गटई चर्मकार समाज कामगार संघटनेच्या वतीने राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेला ‘रापी मोर्चा’ पोलिसांनी अडवला. त्यामुळे काही काळासाठी पोलीस आणि मोर्चेकर्‍यांमध्ये चकमक झाली. दरम्यान, या प्रकरणी चौकशी करुन सात दिवसात कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन ठाणे नगर पोलिसांनी दिले.


ठाणे महानगर पालिकेने महासभेमध्ये ठराव करून चर्मकारांना गटई स्टॉल्सचे परवाने दिले आहेत. तसेच, समाज कल्याण खात्यानेही शहरातील २३८ स्टॉल्सला प्रमाणित केले आहे. हे सर्व स्टॉल्स वाहतुकीला अडथळा ठरणार नाहीत, या पद्धतीने उभे केले आहेत. ठाणे महानगर पालिका आणि राज्य शासनाच्या समाजकल्याण खात्याने प्रमाणित केलेले गटई स्टॉल हटवण्यासाठी ठाणे महानगर पालिका अधिकार्‍यांवर माजी नगरसेवक संजय वाघुले हे दबाव टाकत आहेत. त्यामुळे गटई स्टॉल्सवर कारवाई होत असल्याचा गंभीर आरोप राजाभाऊ चव्हाण यांनी केला आहे.
त्यानुसार, सुमारे ५०० चर्मकार आपल्या कुटुंबासह या मोर्चासाठी उपस्थित होते. मात्र, थोड्याशा अंतरावरच हा मोर्चा अडविण्यात आला.


यावेळी, राजाभाऊ चव्हाण यांनी, “ हा मोर्चा कोणा पक्षाविरुद्ध किंवा व्यक्तीच्या विरोधात नसून प्रवृत्तीच्या विरोधात आहे. केवळ दलितांना हीन लेखण्यासाठी जर कोणी चर्मकारांच्या स्टॉलवर आणि फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी प्रशासनावर दबाव टाकत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही. आज हा मोर्चा अडवण्यात आला असला तरी हे आंदोलन थांबणार नाही”, असा इशारा दिला.


यावेळी राजकुमार मालवी, संतोष अहिरे, सुभाष अहिरे, कैलास लोंगरे, कलिराम मंडराई, गोपाल विश्वकर्मा, मनिषा चव्हाण आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या

मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे

Rain Update : आठवड्याच्या शेवटी पावसाने धरला जोर, अनेक ठिकाणी कोसळधारा, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील