गटई कामगारांचा ‘रापी मोर्चा’ पोलिसांनी अडवला

  121

ठाणे (प्रतिनिधी)- हुतात्मा दिनी गटई चर्मकार समाज कामगार संघटनेच्या वतीने राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेला ‘रापी मोर्चा’ पोलिसांनी अडवला. त्यामुळे काही काळासाठी पोलीस आणि मोर्चेकर्‍यांमध्ये चकमक झाली. दरम्यान, या प्रकरणी चौकशी करुन सात दिवसात कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन ठाणे नगर पोलिसांनी दिले.


ठाणे महानगर पालिकेने महासभेमध्ये ठराव करून चर्मकारांना गटई स्टॉल्सचे परवाने दिले आहेत. तसेच, समाज कल्याण खात्यानेही शहरातील २३८ स्टॉल्सला प्रमाणित केले आहे. हे सर्व स्टॉल्स वाहतुकीला अडथळा ठरणार नाहीत, या पद्धतीने उभे केले आहेत. ठाणे महानगर पालिका आणि राज्य शासनाच्या समाजकल्याण खात्याने प्रमाणित केलेले गटई स्टॉल हटवण्यासाठी ठाणे महानगर पालिका अधिकार्‍यांवर माजी नगरसेवक संजय वाघुले हे दबाव टाकत आहेत. त्यामुळे गटई स्टॉल्सवर कारवाई होत असल्याचा गंभीर आरोप राजाभाऊ चव्हाण यांनी केला आहे.
त्यानुसार, सुमारे ५०० चर्मकार आपल्या कुटुंबासह या मोर्चासाठी उपस्थित होते. मात्र, थोड्याशा अंतरावरच हा मोर्चा अडविण्यात आला.


यावेळी, राजाभाऊ चव्हाण यांनी, “ हा मोर्चा कोणा पक्षाविरुद्ध किंवा व्यक्तीच्या विरोधात नसून प्रवृत्तीच्या विरोधात आहे. केवळ दलितांना हीन लेखण्यासाठी जर कोणी चर्मकारांच्या स्टॉलवर आणि फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी प्रशासनावर दबाव टाकत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही. आज हा मोर्चा अडवण्यात आला असला तरी हे आंदोलन थांबणार नाही”, असा इशारा दिला.


यावेळी राजकुमार मालवी, संतोष अहिरे, सुभाष अहिरे, कैलास लोंगरे, कलिराम मंडराई, गोपाल विश्वकर्मा, मनिषा चव्हाण आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन

प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार मुंबई :

Monsoon Disease: मुंबईकरांनो सावधान! शहरात ‘या’ ३ रोगांचा कहर

मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रुग्णसंख्या वाढल्याने महानगरपालिका सतर्क मुंबई:  शहरात गेली अनेक

मिठीचा गाळ, गोतास काळ; ७,००० पानांचे आरोपपत्र, मोठे मासे सापडणार!

मुंबई पोलिसांकडून मिठी नदी गाळ काढणी घोटाळा उघड ६५.५४ कोटींचा धक्कादायक प्रकार! मुंबई : ६५.५४ कोटींच्या मिठी

सांगा चूक कोणाची? लपवाछपवी कोणासाठी? बीएमसी आणि म्हाडामध्ये घमासान!

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) यांच्यात चांदिवलीतील

वसई विरार मनपाच्या माजी आयुक्तांनंतर आणखी एका बड्या अधिकाऱ्यावर ED ची धाड

मुंबई : वसई विरारचे महापालिकेचे महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार यांच्यावर ED नं काही दिवसांपूर्वीच धाड टाकली

हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांनी बनवले फेक इन्स्टाग्राम अकाउंट

मुंबई : मुंबईतील धारावी परिसरात एप्रिल महिन्यात एका वीस वर्षीय तरुणाने एका व्यक्तीला धारदार हत्याराने वार करत