कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष

अलिबाग, सुभाष म्हात्रे : कोकण शिक्षक मतदारसंघासाठी रायगड जिल्ह्यात आज शांततेत मतदान पार पडले. सुमारे ९३.५६ टक्के मतदान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील आणि भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यामध्येच खरी सरळ लढत होत असल्याने विजयी गुलाल कोण उधळणार याकडचे सर्वांचे लक्ष लागले आहे.


सकाळी 8 वाजल्यापासून रायगड जिल्ह्यातील २७ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. सकाळी ८ ते सकाळी १० वाजेपर्यंत १६.९३ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. त्यानंतर १२ वाजेपर्यंत ४८.७८ टक्के मतदान झाले होते. दुपारी दोन वाजेपर्यंत ७३.९६ टक्के मतदान झाले होते. दुपारी चार वाजेपर्यंत सुमारे ९ हजार ४५० मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावल्याचा अंदाज आहे. त्यामध्ये ४ हजार १४३ पुरुष शिक्षक, तर ५ हजार ३०७ महिला शिक्षक मतदारांचा समावेश आहे.


काही अपवाद वगळले तर या मतदानसंघावर कायम भाजपप्रणित शिक्षक परिषदेचा वरचष्मा राहिला आहे. सुरुवातीला प्रभाकर सावंत, त्यानंतर वसंत बापट, सुरेश भालेराव, रामनाथ मोते शिक्षक परिषदेकडून या मतदारसंघातून निवडून आले होते. वसंत बापट आणि रामनाथ मोते यांनी प्रत्येकी दोनवेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने शेकापने भाजपचे संस्थानाला सुरुंग लावत पनवेल येथील रयत शिक्षण संस्थेवर काम करणारे बाळाराम पाटील पहिल्यांदा या मतदारसंघातून निवडून गेले होते. त्यामुळे शेकापने खालसा केलेला हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे. त्यामुळे विजयाची माळ कोण गळ्यात घालणार हे २ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.


Comments
Add Comment

Narayan Rane : "आमच्यात कटुता असली तरी जिव्हाळा कायम!" भास्कर जाधवांनी व्यक्त केली राणे साहेबांबद्दलची कृतज्ञता;

'त्या' घटनेनंतर जुन्या आठवणींना उजाळा चिपळूण : राजकारणात एकमेकांवर तुटून पडणारे नेते, वैयक्तिक आयुष्यात

फोंडाघाटचा ‘किऱ्याचा आंबा’ होणार जमीनदोस्त

कणकवली : फोंडाघाट, हवेलीनगर येथील शेकडो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक अधिष्ठान आणि मार्गदर्शक आख्यायिका, तसेच

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

उद्यापर्यंत ब्लॉक रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण

Eknath Shinde : शिंदेंकडून निलेश राणेंचं तोंडभरून कौतुक! "इलाका किसी का भी हो, धमाका निलेश राणेच करणार"; मालवण हा सेनेचाच बालेकिल्ला

मालवणमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांचे