प्राणी कल्याण सप्ताह निमित्त विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम

ठाणे:  ठाणे महानगरपालिकेच्या वतीने उद्या ३० जानेवारीला ६ ते ८ वीच्या निवडक विद्यार्थ्यांची येऊर येथील गोशाळेत भेट आयोजित केली आहे. जीवजंतू कल्याण दिवस आणि प्राणी कल्याण पंधरवडा सप्ताहाच्या समारोपाच्या निमित्ताने सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

श्री पशुरक्षक मंडल ट्रस्ट येऊर, येथे या विद्यार्थ्यांना गोवंश, म्हसवंश जनावरांकडुन प्राप्त दुध व पदार्थांंची माहिती दिली जाईल तसेच गोशाळेमध्ये तयार होणाऱ्या बायोगॅस, विविध औषधे, नैसर्गिक पद्धतीने तयार केलेली उत्पादने, अगरबत्ती आदींबाबत माहिती देण्यात येणार आहे.

कुत्रा किंवा साप चावल्यानंतर करावयाचे प्राथमिक उपचार, प्लास्टिक उत्पादनांचा पक्षी प्राणी यांच्यावर होत असलेला परिणाम याचीही माहिती दिली जाईल. तसेच भटक्या प्राण्यांसाठी काम करणाऱ्या व भटके कुत्रे दत्तक घेणाऱ्या नागरिकांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.
Comments
Add Comment

Eknath Shinde : ठाण्यातील आनंद आश्रमात मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्री, आमदार, पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट ठाणे :- तमाम शिवसैनिकांचे श्रद्धास्थान

Malshej Ghat : वीकेंडला माळशेजला जाताय ? थांबा! रस्ता खचल्याने घाट आणखी ३–४ दिवस राहणार बंद; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

ठाणे : पावसाळ्यात धबधबे आणि हिरवाईचा आनंद घेण्यासाठी माळशेज घाटाकडे जाण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी

Thane District Hospital : ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे काम 'फास्टट्रॅक'वर पूर्ण करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

ठाणे : ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत

Badlapur Shaken : केकमध्ये आढळली उंदराची विष्ठा; नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या बेकरीवर एफडीएची धडक कारवाई

BADLAPUR: महाराष्ट्रातील बदलापूर शहरातून एक अतिशय संतापजनक आणि आरोग्याशी खेळणारा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. येथील

Heavy Rain : बदलापूर आणि वांगणी परिसरात वादळी वाऱ्याचा आणि मुसळधार पावसाचा तडाखा; जनजीवन विस्कळीत, वीजपुरवठा खंडित

बदलापूर: ठाणे जिल्ह्यातील बदलापूर आणि वांगणी परिसराला मागील काही दिवसांपासून वादळी वारा आणि मुसळधार पावसाने

Mumbai Local : गर्दीचा मनस्ताप संपणार! सीएसएमटी-कसारा मार्गावर लवकरच धावणार १५ डब्यांची लोकल

मुंबई : मुंबईची जीवन वाहिनी मानल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या (Central Railway) मुख्य मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या