'सरकार लवकरच लव्ह जिहाद कायदा आणणार'

मुंबई: भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सरकार लवकरच लव्ह जिहाद कायदा आणणार असल्याचे सुतोवाच केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार लवकरच लव्ह जिहाद कायदा आणेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


लव्ह जिहाद, धर्मांतर आणि लँड जिहाद विरोधात कायदा करावा या मागणीसाठी आज सकाळी मुंबईत 'सकल हिंदू समाजा'च्या वतीने 'हिंदू जन आक्रोश मोर्चा' काढण्यात आला होता. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानातून निघालेला मोर्चा प्रभादेवी कामगार मैदानावर संपला. या मोर्चात हिंदू संघटनांचे नेते तसेच भाजप आणि शिंदे गटाचे नेते सहभागी झाले होते.


ते पुढे म्हणाले, मुंबईतील हिंदूंचा हा मोर्चा तुम्ही पाहिला आहे. हिंदूंची संख्या वाढल्याने शक्तीही अधिक आहे. त्यामुळेच आता हे बांगलादेशी, रोहिंग्या, जिहादी विचारसरणीचे लोक मुंबईत येऊन मुंबईतील हिंदूंची संख्या कमी करत आहेत. लँड जिहाद आणि लव्ह जिहाद करण्याचा कट रचणाऱ्यांना मुंबईतील आमच्या माता-भगिनी चोख उत्तर देऊ शकतात, हे दाखवून देण्यासाठी आजचा मोर्चा आहे.



हे हिंदूंचे भगवे वादळ


हे हिंदूंचे भगवे वादळ असल्याचा एल्गारही यावेळी आमदार नितेश राणे यांनी केला आहे. ते म्हणाले, हे भगवे वादळ आता थांबणार नाही. जिहादी पोसण्याचा कितीही प्रयत्न केला तरी मुंबईचा डीएनए भगवा आहे. आमचे रक्त भगवे आहे हे मुंबईकरांनी हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.

Comments
Add Comment

राज ठाकरेंचा निवडणूक आयोगावर आरोप: जयकुमार गोरे म्हणाले, "मतदार याद्या पहिल्यांदाच पाहिल्या असाव्यात!"

मुंबई : महाराष्ट्रात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे

मुंबई विमानतळावर १.६ कोटींच्या सोन्याची तस्करी, दोघांना अटक

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) मोठी कारवाई करत दोन सफाई

मुंबईतील रेल्वे स्थानकावर जन्मलेल्या बाळाची प्रकृती चिंताजनक

मुंबई : राम मंदिर रेल्वे स्थानकावर जन्मलेल्या बाळाची प्रकृती चिंताजनक आहे. हे बाळ सध्या कूपर रुग्णालयात उपचार

मिनिटांत पार्सल पोचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयला एका ऑर्डरमागे किती पैसे मिळतात ? जाणून घ्या वास्तव

मुंबई : आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन डिलिव्हरी ही आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनली आहे. Zepto, Zomato, Amazon, Myntra यांसारख्या

महापालिका आयुक्त थेट घरीच पोहोचले आणि त्यांच्यात यंदाच्या दिवाळीत आनंदाची लहर उमटली

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी म्हणजे असे व्यक्तिमत्व जे वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ३३ लाख पूरग्रस्त शेतकऱ्यांना ३ हजार कोटींची मदत

मुंबई : यंदा सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्र्रात पावसाने थैमान घातले. शेतीपासून लोकांची घरंदारं सगळंच पावसात