'सरकार लवकरच लव्ह जिहाद कायदा आणणार'

मुंबई: भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सरकार लवकरच लव्ह जिहाद कायदा आणणार असल्याचे सुतोवाच केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार लवकरच लव्ह जिहाद कायदा आणेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


लव्ह जिहाद, धर्मांतर आणि लँड जिहाद विरोधात कायदा करावा या मागणीसाठी आज सकाळी मुंबईत 'सकल हिंदू समाजा'च्या वतीने 'हिंदू जन आक्रोश मोर्चा' काढण्यात आला होता. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानातून निघालेला मोर्चा प्रभादेवी कामगार मैदानावर संपला. या मोर्चात हिंदू संघटनांचे नेते तसेच भाजप आणि शिंदे गटाचे नेते सहभागी झाले होते.


ते पुढे म्हणाले, मुंबईतील हिंदूंचा हा मोर्चा तुम्ही पाहिला आहे. हिंदूंची संख्या वाढल्याने शक्तीही अधिक आहे. त्यामुळेच आता हे बांगलादेशी, रोहिंग्या, जिहादी विचारसरणीचे लोक मुंबईत येऊन मुंबईतील हिंदूंची संख्या कमी करत आहेत. लँड जिहाद आणि लव्ह जिहाद करण्याचा कट रचणाऱ्यांना मुंबईतील आमच्या माता-भगिनी चोख उत्तर देऊ शकतात, हे दाखवून देण्यासाठी आजचा मोर्चा आहे.



हे हिंदूंचे भगवे वादळ


हे हिंदूंचे भगवे वादळ असल्याचा एल्गारही यावेळी आमदार नितेश राणे यांनी केला आहे. ते म्हणाले, हे भगवे वादळ आता थांबणार नाही. जिहादी पोसण्याचा कितीही प्रयत्न केला तरी मुंबईचा डीएनए भगवा आहे. आमचे रक्त भगवे आहे हे मुंबईकरांनी हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.

Comments
Add Comment

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७

भावनिक आवाहनाला न फसता महाराष्ट्राच्या विकासाला मतदारांची पसंती - भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई : वर्षानुवर्षे भाजपा कार्यकर्त्याने यशाच्या दिशेने पार्टीला नेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार

BMC Election 2026 : भाजपची ऐतिहासिक मुसंडी तर ठाकरे, काँग्रेसचं काय? २९ महापालिकांच्या रणसंग्रामाचे 'A to Z' अपडेट्स!

मुंबई : भाजपचे निर्विवाद वर्चस्व राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील

मुंबईत महायुतीला बहुमत मिळाल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून केले अभिनंदन

राज्यभरातील २९ महानगरपालिकांमध्ये महायुतीच अव्वल मुंबई : अत्यंत प्रतिष्ठेची निवडणुक ठरलेल्या मुंबई