'सरकार लवकरच लव्ह जिहाद कायदा आणणार'

मुंबई: भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सरकार लवकरच लव्ह जिहाद कायदा आणणार असल्याचे सुतोवाच केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार लवकरच लव्ह जिहाद कायदा आणेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


लव्ह जिहाद, धर्मांतर आणि लँड जिहाद विरोधात कायदा करावा या मागणीसाठी आज सकाळी मुंबईत 'सकल हिंदू समाजा'च्या वतीने 'हिंदू जन आक्रोश मोर्चा' काढण्यात आला होता. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानातून निघालेला मोर्चा प्रभादेवी कामगार मैदानावर संपला. या मोर्चात हिंदू संघटनांचे नेते तसेच भाजप आणि शिंदे गटाचे नेते सहभागी झाले होते.


ते पुढे म्हणाले, मुंबईतील हिंदूंचा हा मोर्चा तुम्ही पाहिला आहे. हिंदूंची संख्या वाढल्याने शक्तीही अधिक आहे. त्यामुळेच आता हे बांगलादेशी, रोहिंग्या, जिहादी विचारसरणीचे लोक मुंबईत येऊन मुंबईतील हिंदूंची संख्या कमी करत आहेत. लँड जिहाद आणि लव्ह जिहाद करण्याचा कट रचणाऱ्यांना मुंबईतील आमच्या माता-भगिनी चोख उत्तर देऊ शकतात, हे दाखवून देण्यासाठी आजचा मोर्चा आहे.



हे हिंदूंचे भगवे वादळ


हे हिंदूंचे भगवे वादळ असल्याचा एल्गारही यावेळी आमदार नितेश राणे यांनी केला आहे. ते म्हणाले, हे भगवे वादळ आता थांबणार नाही. जिहादी पोसण्याचा कितीही प्रयत्न केला तरी मुंबईचा डीएनए भगवा आहे. आमचे रक्त भगवे आहे हे मुंबईकरांनी हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.

Comments
Add Comment

मुंबई वॉटर मेट्रो जलवाहतूक प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुंबई : "मुंबई महानगर प्रदेशात जलप्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात

आमदार हेमंत पाटील यांनी मांडली 'लव्ह जिहाद' आणि 'लोकसंख्या नियंत्रणाची' आग्रही भूमिका

विधान परिषदेत धर्मांतर विरोधी विधेयकावर चर्चा मुंबई : विधान परिषदेत आज धर्मांतर विरोधी विधेयकावर अत्यंत

धर्मांतर हा श्रद्धेचा विषय, व्यवहाराचा नाही!"; विधान परिषदेत आमदार प्रवीण दरेकरांची ठाम भूमिका

मुंबई: "धर्म हा केवळ मानवी श्रद्धेचा भाग असून त्याचा व्यवहारासाठी किंवा स्वार्थासाठी वापर करणे चुकीचे आहे.

राज्यातील कालबाह्य ८० कायदे रद्द

विधेयक मंजूर; मुंबई फटक्यांची शिक्षा रद्द करण्याचा अधिनियम रद्द मुंबई : महाराष्ट्रातील कालबाह्य झालेले ८०

नायजेरियन नागरिकांविरोधात लवकरच धडक मोहीम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वैध कागदपत्रे नसलेल्यांना हद्दपार करणार मुंबई : राज्यात विशेषतः मुंबईनजीकच्या उपनगरांमध्ये बेकायदेशीरपणे

ड्रग्ज तस्करी रोखण्यासाठी कारवाईची वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षे करणार

मुंबई : अमली पदार्थांच्या तस्करीसाठी मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुलांचा उपयोग केला जात आहे. त्यामुळे याला पायबंद