कणकवलीत परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

मयूर ठाकूर (कणकवली ): देशात सर्वत्र "परीक्षा पे चर्चा" २०२३ कार्यक्रम आयोजित करण्यात आला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून विद्यार्थांना मार्गदर्शन आणि मुलांचे प्रश्न समजून घेत आले व या कार्यक्रमाच्या निमित्ताने मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार नितेश राणे यांनी कणकवली तालुक्यातील शाळांमध्ये भेटी दिल्या व "परीक्षा पे चर्चा" कार्यक्रमात सहभाग घेतला. दरम्यान ऑनलाइन च्या माध्यमातून परीक्षा पे चर्चा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शालेय विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविला आहे.


आमदार नितेश राणे यांनी कणकवली तालुक्यातील शाळांना भेट देत कार्यक्रमात सहभाग घेतला. दरम्यान कणकवली कॉलेजच्या एच. पी. सी. एल. हॉलमध्ये स्क्रिन वर ऑनलाइन च्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांन सोबत जो संवाद साधला तो ऐकला. दरम्यान आमदार नितेश राणे यांनीही मुलांचे स्थानिक प्रश्न समजून घेतले.


यावेळी आम. नितेश राणे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष आण्णा कोदे, नगरसेविका मेघा गांगण, डॉ. राजश्री साळुंखे तसेच कणकवली कॉलेज कणकवली चे सर्व शिक्षक ,विद्यार्थी तसेच इतर शाळांतील विद्यार्थी या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाला उपस्थित होते.

Comments
Add Comment

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण

Eknath Shinde : शिंदेंकडून निलेश राणेंचं तोंडभरून कौतुक! "इलाका किसी का भी हो, धमाका निलेश राणेच करणार"; मालवण हा सेनेचाच बालेकिल्ला

मालवणमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांचे

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे धुक्यामुळे भीषण अपघात

शिवशाही बस, ट्रकमध्ये धडक; १ ठार, ११ जखमी प्रमोद जाधव माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे.

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी

Narayan Rane : 'कोण आदित्य ठाकरे?' "बाळासाहेबांनंतर शिवसेना राहिली नाही! नारायण राणेंचा उद्धव गटावर हल्लाबोल

चिपळूण : भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज चिपळूण दौऱ्यादरम्यान शिउबाठा नेतृत्वावर अत्यंत कडक शब्दांत टीका