कणकवलीत परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

मयूर ठाकूर (कणकवली ): देशात सर्वत्र "परीक्षा पे चर्चा" २०२३ कार्यक्रम आयोजित करण्यात आला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून विद्यार्थांना मार्गदर्शन आणि मुलांचे प्रश्न समजून घेत आले व या कार्यक्रमाच्या निमित्ताने मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार नितेश राणे यांनी कणकवली तालुक्यातील शाळांमध्ये भेटी दिल्या व "परीक्षा पे चर्चा" कार्यक्रमात सहभाग घेतला. दरम्यान ऑनलाइन च्या माध्यमातून परीक्षा पे चर्चा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शालेय विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविला आहे.


आमदार नितेश राणे यांनी कणकवली तालुक्यातील शाळांना भेट देत कार्यक्रमात सहभाग घेतला. दरम्यान कणकवली कॉलेजच्या एच. पी. सी. एल. हॉलमध्ये स्क्रिन वर ऑनलाइन च्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांन सोबत जो संवाद साधला तो ऐकला. दरम्यान आमदार नितेश राणे यांनीही मुलांचे स्थानिक प्रश्न समजून घेतले.


यावेळी आम. नितेश राणे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष आण्णा कोदे, नगरसेविका मेघा गांगण, डॉ. राजश्री साळुंखे तसेच कणकवली कॉलेज कणकवली चे सर्व शिक्षक ,विद्यार्थी तसेच इतर शाळांतील विद्यार्थी या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाला उपस्थित होते.

Comments
Add Comment

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

Narayan Rane : "आमच्यात कटुता असली तरी जिव्हाळा कायम!" भास्कर जाधवांनी व्यक्त केली राणे साहेबांबद्दलची कृतज्ञता;

'त्या' घटनेनंतर जुन्या आठवणींना उजाळा चिपळूण : राजकारणात एकमेकांवर तुटून पडणारे नेते, वैयक्तिक आयुष्यात

फोंडाघाटचा ‘किऱ्याचा आंबा’ होणार जमीनदोस्त

कणकवली : फोंडाघाट, हवेलीनगर येथील शेकडो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक अधिष्ठान आणि मार्गदर्शक आख्यायिका, तसेच

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

उद्यापर्यंत ब्लॉक रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या