सरफराजबाबत बीसीसीआयच्या निवडकर्त्याने अखेर मौन तोडले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईचा धडाकेबाज फलंदाज सरफराज खानवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. त्याला लवकरच संधी मिळेल, परंतु, यावेळी संघात रचना आणि संतुलन आवश्यक आहे, असे टीम इंडियाच्या निवड समिती पॅनेलचे सदस्य श्रीधरन शरथ म्हणाले. सरफराज खानला भारतीय संघात स्थान न मिळाल्यामुळे सरफराज खानने नाराजी व्यक्त केली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यावर चर्चाही रंगत आहेत. दरम्यान शुक्रवारी शरथ यांनी या विषयावरील मौन सोडले आहे. एका क्रीडा मासिकाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.


शरथ यांनी विराट कोहली, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा यांसारख्या दिग्गजांसह युवा स्टार्सचे कौतुक केले. ते म्हणाले की कोहली अजूनही सामना विजेता आहे. त्याचवेळी चेतेश्वर पुजाराने फलंदाजीत स्थिरता आणली. रोहित शर्मा एक चांगला लीडर आणि उत्तम फलंदाज आहे. श्रेयस अय्यरने चांगली कामगिरी केली आहे. शुभमन गिल आणि के.एल. राहुलमध्ये सामने जिंकण्याची क्षमता आहे. आता या खेळाडूंच्या उपस्थितीमुळे संघात संतुलन आहे. जे खूप महत्त्वाचे आहे, असे शरथ म्हणाले.

Comments
Add Comment

भारताने झिम्बाब्वे विरूद्धच्या सामन्यात उभारला धावांचा डोंगर

चेन्नई : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये झिम्बाब्वे विरूद्धच्या सुपर एट फेरीतील सामन्यात भारताने

दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय

अहमदाबाद : वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ अंतर्गत सुपर ८ फेरीचा

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडचा विजय

कोलंबो : आर. प्रेमदासा स्टेडियम येथे आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील सुपर ८ फेरीतल्या श्रीलंका विरुद्ध

न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची निराशाजनक सुरुवात

कोलंबो : आर. प्रेमदासा स्टेडियम येथे आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील सुपर ८ फेरीतला श्रीलंका विरुद्ध

...तरच भारत सेमी फायनल खेळू शकेल

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये सुपर ८ फेरीचे सामने सुरू आहेत. ग्रुप एक मध्ये वेस्ट इंडिज (धावगती

फिटनेस स्टार मयांक पवार याचे ३७ व्या वर्षी आकस्मिक निधन

मुंबई : रिअ‍ॅलिटी शोच्या दुनियेतून प्रसिद्धी मिळवलेले आणि फिटनेस क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करणारे