सरफराजबाबत बीसीसीआयच्या निवडकर्त्याने अखेर मौन तोडले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईचा धडाकेबाज फलंदाज सरफराज खानवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. त्याला लवकरच संधी मिळेल, परंतु, यावेळी संघात रचना आणि संतुलन आवश्यक आहे, असे टीम इंडियाच्या निवड समिती पॅनेलचे सदस्य श्रीधरन शरथ म्हणाले. सरफराज खानला भारतीय संघात स्थान न मिळाल्यामुळे सरफराज खानने नाराजी व्यक्त केली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यावर चर्चाही रंगत आहेत. दरम्यान शुक्रवारी शरथ यांनी या विषयावरील मौन सोडले आहे. एका क्रीडा मासिकाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.


शरथ यांनी विराट कोहली, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा यांसारख्या दिग्गजांसह युवा स्टार्सचे कौतुक केले. ते म्हणाले की कोहली अजूनही सामना विजेता आहे. त्याचवेळी चेतेश्वर पुजाराने फलंदाजीत स्थिरता आणली. रोहित शर्मा एक चांगला लीडर आणि उत्तम फलंदाज आहे. श्रेयस अय्यरने चांगली कामगिरी केली आहे. शुभमन गिल आणि के.एल. राहुलमध्ये सामने जिंकण्याची क्षमता आहे. आता या खेळाडूंच्या उपस्थितीमुळे संघात संतुलन आहे. जे खूप महत्त्वाचे आहे, असे शरथ म्हणाले.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत