सरफराजबाबत बीसीसीआयच्या निवडकर्त्याने अखेर मौन तोडले

  94

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईचा धडाकेबाज फलंदाज सरफराज खानवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. त्याला लवकरच संधी मिळेल, परंतु, यावेळी संघात रचना आणि संतुलन आवश्यक आहे, असे टीम इंडियाच्या निवड समिती पॅनेलचे सदस्य श्रीधरन शरथ म्हणाले. सरफराज खानला भारतीय संघात स्थान न मिळाल्यामुळे सरफराज खानने नाराजी व्यक्त केली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यावर चर्चाही रंगत आहेत. दरम्यान शुक्रवारी शरथ यांनी या विषयावरील मौन सोडले आहे. एका क्रीडा मासिकाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.


शरथ यांनी विराट कोहली, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा यांसारख्या दिग्गजांसह युवा स्टार्सचे कौतुक केले. ते म्हणाले की कोहली अजूनही सामना विजेता आहे. त्याचवेळी चेतेश्वर पुजाराने फलंदाजीत स्थिरता आणली. रोहित शर्मा एक चांगला लीडर आणि उत्तम फलंदाज आहे. श्रेयस अय्यरने चांगली कामगिरी केली आहे. शुभमन गिल आणि के.एल. राहुलमध्ये सामने जिंकण्याची क्षमता आहे. आता या खेळाडूंच्या उपस्थितीमुळे संघात संतुलन आहे. जे खूप महत्त्वाचे आहे, असे शरथ म्हणाले.

Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी