भाईंदरमध्ये राष्ट्रीय मतदार दिनानमित्त जनजागृती कार्यक्रम

  173

भाईंदर : भाईंदर पूर्वेच्या अभिनव महाविद्यालयात बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास राष्ट्रीय मतदार दिनानमित्त राष्ट्रीय सेवा योजना आणि राज्यशास्र विभागाच्या वतीने मतदार जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


या मतदार जनजागृती कार्यक्रमात एकूण ६८ विद्यार्थ्यांचा समावेश होता. या कार्यक्रमात विनय पाल व झोहराशेख या विद्यार्थ्यांनी 'मतदानाचे महत्व' या विषयावर आपले मत व्यक्त केले. त्यासोबतच मतदारांसाठी असलेली प्रतिज्ञाही घेण्यात आली. या कार्यक्रमाला मतदार नोंदणी अधिकारी १४६ ओवळा माजिवाडा मतदार संघ यांचे व त्यांच्या अधिकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले होते. ठाणे तहसिलदार आशिष बिरादर व मीरा भाईंदर महानगर पालिका प्रभाग अधिकारी योगेश गुनिजन यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. अभिनव महाविद्यालयाचे व्यवस्थापन मंडळ आणि प्राचार्य डॉ.आॉल्विन मेनेजेस यांनी देखील कार्यक्रमा दरम्यान प्रबोधन केले. कार्यक्रमाच्या आयोजनात महाविद्यालयाचे लिपिक संतोष पेढणेकर यांचे मोलाचे योगदान होते. कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक अरूणा गूजर, प्राध्यापक नितिन सोनावणे यांनी कार्यक्रमांचे समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली.

Comments
Add Comment

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर, नगरसेवक संख्येत वाढ नाहीच, यंदाही 131 नगसेवक

मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून आज ठाणे महानगरपालिकेची

Bhiwandi Accident : भिवंडीत खड्ड्यांनी घेतला डॉक्टरचा बळी; आतापर्यंत जीवघेण्या खड्ड्यामुळे तिघांचे प्राण गेले, जबाबदार कोण?

भिवंडी : भिवंडी शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. वंजारपट्टी नाका परिसरात उघडखाबड

ठाण्यात मुसळधार पावसामुळे गणपती कारखान्यात शिरलं पाणी

ठाण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना पावसाचा फटका गणपती मूर्तीला देखील बसला

पावसामुळे ठाण्यात ४ महिन्यांत २० जणांचा बळी!

ठाणे: गेल्या चार महिन्यांत ठाणे जिल्ह्यात पावसामुळे संबंधित घटनांमध्ये किमान २० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुरू केले ‘लाडकी सून’ अभियान

ठाणे: 'लाडकी बहीण' योजनेच्या यशामुळे उत्साहित होऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी