पतंगाच्या मांज्याने गळा कापून ८ वर्षीय मुलाचा मृत्यू

मनोर(वार्ताहर) : पतंगाच्या मांज्यामुळे गळा कापल्याने पालघर जिल्ह्यातील गालतरे गावच्या हद्दीत आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. कारच्या सनरूफमधून कारबाहेर डोकावत असतांना आठ वर्षीय मुलाचा गळा कापला होता. गळ्यावर झालेल्या जखमेतून झालेल्या अतिरक्तस्रावामुळे गंभीर अवस्थेत रुग्णवाहिकेतून मुंबईच्या दिशेने जात असतांना वाटेत त्याचा मृत्यू झाला. दिशान तिवारी असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे.


रविवारी सायंकाळी हमरापूर-नाणे रस्त्यावर गालतरे गावच्या हद्दीत ही घटना घडली. मुंबईतील कांदिवली येथून तिवारी कुटुंबीय रविवारी हमरापूर नाणे रस्त्यावरील गालतरे येथे आले होते. मुलगा कारमध्ये उभा राहून कारच्या सनरुफमधून कारबाहेर डोकावून रस्त्यावर डोंगर आणि निसर्ग सौंदर्य न्याहाळत होता. यावेळी अचानक पतंगाचा नायलॉन मांजा दिशानच्या गळ्यात अडकल्याने त्याचा गळा कापला गेला व त्याच्या मोठी जखम झाली. लागलीच त्याला उपचारासाठी महामार्गावरील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मोठ्या प्रमाणात सुरू असलेला रक्तस्राव आणि मानेची नस कापल्यामुळे त्याची प्रकृती गंभीर झाली होती. त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले होते, परंतु रुग्णवाहिकेच्या प्रवासादरम्यान आई-वडिलांच्या मांडीवरच त्याचा दुःखद अंत झाला.

Comments
Add Comment

विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम सुरू होण्याच्या दिशेने एक पाऊल

चार तासांचा प्रवास केवळ दीड तासांत होणार मुंबई  : गेल्या ९ वर्षांपासून रखडलेल्या विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम

खासदार डॉ. सवरा पालघरचे निवडणूक प्रभारी

आमदार राजन नाईक वसई-विरारचे निवडणूक प्रमुख पालघर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता

विरार-अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिकेच्या भूसंपादनाच्या कर्जास शासन हमी

मुंबई : विरार ते अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिकेच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला

पालघर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कामास गती देण्यासाठी वॉररुमध्ये हा प्रकल्प घेण्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश

मुंबई : पालघरमधील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्याच्या परिसरातील

वसई विरार महापालिका क्षेत्रातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणास गती

विरार, विराट नगर, ओस्वालनगरी नालासोपारा, अलकापुरी, उमेळमान या ठिकाणी रेल्वे उड्डाणपुलाचे नियोजन मुंबई : वसई

वसईत बर्डपार्क उभारण्यासाठी पालकमंत्री गणेश नाईक सरसावले!

मुंबई : वसई विरार महापालिकेच्या हद्दीत बर्ड पार्क उभारण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. या पार्कमध्ये पक्षांना