पतंगाच्या मांज्याने गळा कापून ८ वर्षीय मुलाचा मृत्यू

मनोर(वार्ताहर) : पतंगाच्या मांज्यामुळे गळा कापल्याने पालघर जिल्ह्यातील गालतरे गावच्या हद्दीत आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. कारच्या सनरूफमधून कारबाहेर डोकावत असतांना आठ वर्षीय मुलाचा गळा कापला होता. गळ्यावर झालेल्या जखमेतून झालेल्या अतिरक्तस्रावामुळे गंभीर अवस्थेत रुग्णवाहिकेतून मुंबईच्या दिशेने जात असतांना वाटेत त्याचा मृत्यू झाला. दिशान तिवारी असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे.


रविवारी सायंकाळी हमरापूर-नाणे रस्त्यावर गालतरे गावच्या हद्दीत ही घटना घडली. मुंबईतील कांदिवली येथून तिवारी कुटुंबीय रविवारी हमरापूर नाणे रस्त्यावरील गालतरे येथे आले होते. मुलगा कारमध्ये उभा राहून कारच्या सनरुफमधून कारबाहेर डोकावून रस्त्यावर डोंगर आणि निसर्ग सौंदर्य न्याहाळत होता. यावेळी अचानक पतंगाचा नायलॉन मांजा दिशानच्या गळ्यात अडकल्याने त्याचा गळा कापला गेला व त्याच्या मोठी जखम झाली. लागलीच त्याला उपचारासाठी महामार्गावरील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मोठ्या प्रमाणात सुरू असलेला रक्तस्राव आणि मानेची नस कापल्यामुळे त्याची प्रकृती गंभीर झाली होती. त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले होते, परंतु रुग्णवाहिकेच्या प्रवासादरम्यान आई-वडिलांच्या मांडीवरच त्याचा दुःखद अंत झाला.

Comments
Add Comment

वसई स्काय वॉकचा काही भाग कोसळला

वसई : वसई - विरार महानगरपालिका हद्दीत सध्या धोकादायक बांधकामे,उद्यान, नाल्यावरील स्लॅब कोसळण्याचा घटना सतत घडत

पालघरच्या किनाऱ्यावर ३ संशयास्पद कंटेनर आढळले! सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा

पालघर: जिल्ह्यातील किनारपट्टी भागात तीन संशयास्पद कंटेनर वाहून आल्याची बातमी समोर येत आहे. महामंडळाचे अधिकारी

Ganeshotsav 2025 : घोणसईत गणपतीबरोबर देशभक्ती! 'ऑपरेशन सिंदूर' देखावा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

गणेशोत्सवात देशभक्तीचा संगम – हर्षल पाटील यांचा देखावा ठरत आहे आकर्षणाचा केंद्रबिंदू पालघर : गणेशोत्सव २०२५

विरार इमारत दुर्घटनेत या १७ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये एक वर्षाच्या चिमुरडीचाही समावेश

विरार : विरार पूर्व येथील चामुंडानगरमधील रमाबाई अपार्टमेंट कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू

विरारमधील जुनी इमारत कोसळली, वाढदिवसाच्या कार्यक्रमावर काळजात धस्स करणारी घटना

विरार: गणेशोत्सवाचा आनंद सर्वत्र साजरा होत असताना, मुंबईजवळील विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विरार

बेरोजगार उमेदवारांसाठी इस्राायल येथे रोजगाराची संधी

युवक-युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन पालघर : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता