शिंदे गटाच्या जागांवर भाजपचा दावा नाही

पुणे: शिंदे गटाचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण मतदार संघात कमळ फुलणार का? असा प्रश्न उपस्थित केले जात असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व प्रश्नांना पुर्ण विराम दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे या मतदार संघाचे आमदार असल्याने अनेक सवाल उपस्थित केले जात होते. पण देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गटाच्या जागा या त्यांच्याच राहतील असे स्पष्ट केले आहे.


पुण्यातील पुरंदर तालुक्यातील कार्यक्रमाला आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हे विधान केले. एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत या मतदार संघाचे आमदार आहेत. त्यामुळे भाजप या जागांवर निवडणूक लढवणार का असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. त्यावेळी शिंदे गटाच्या जागा लढविण्याचा प्रश्नच येत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


दरम्यान भाजपच्या लोकसभा मिशनबाबत अधिक माहिती देताना, देवेंद्र फडणवीस यांनी हे मिशन भारतव्यापी त्याचप्रमाणे महाराष्ट्र व्यापीही असेल असे म्हटले. याचवेळी बारामती महाराष्ट्रात आहे, असा टोला त्यांनी लगावला.


भाजपसोबत एकनाथ शिंदे यांची खरी शिवसेना आहे. शिंदे गटाचे जे लोक आमच्याबरोबर आले आहेत. त्यांच्या जागेवर आम्ही दावा करणार नाही. शिवसेनेच्या उर्वरीत जागांबाबत एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जागेवर भाजप दावा करत असल्याच्या चर्चेत तथ्य नसल्याचे स्पष्ट केले.

Comments
Add Comment

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी