शिंदे गटाच्या जागांवर भाजपचा दावा नाही

  128

पुणे: शिंदे गटाचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण मतदार संघात कमळ फुलणार का? असा प्रश्न उपस्थित केले जात असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व प्रश्नांना पुर्ण विराम दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे या मतदार संघाचे आमदार असल्याने अनेक सवाल उपस्थित केले जात होते. पण देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गटाच्या जागा या त्यांच्याच राहतील असे स्पष्ट केले आहे.


पुण्यातील पुरंदर तालुक्यातील कार्यक्रमाला आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हे विधान केले. एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत या मतदार संघाचे आमदार आहेत. त्यामुळे भाजप या जागांवर निवडणूक लढवणार का असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. त्यावेळी शिंदे गटाच्या जागा लढविण्याचा प्रश्नच येत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


दरम्यान भाजपच्या लोकसभा मिशनबाबत अधिक माहिती देताना, देवेंद्र फडणवीस यांनी हे मिशन भारतव्यापी त्याचप्रमाणे महाराष्ट्र व्यापीही असेल असे म्हटले. याचवेळी बारामती महाराष्ट्रात आहे, असा टोला त्यांनी लगावला.


भाजपसोबत एकनाथ शिंदे यांची खरी शिवसेना आहे. शिंदे गटाचे जे लोक आमच्याबरोबर आले आहेत. त्यांच्या जागेवर आम्ही दावा करणार नाही. शिवसेनेच्या उर्वरीत जागांबाबत एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जागेवर भाजप दावा करत असल्याच्या चर्चेत तथ्य नसल्याचे स्पष्ट केले.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत