शिंदे गटाच्या जागांवर भाजपचा दावा नाही

पुणे: शिंदे गटाचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण मतदार संघात कमळ फुलणार का? असा प्रश्न उपस्थित केले जात असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व प्रश्नांना पुर्ण विराम दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे या मतदार संघाचे आमदार असल्याने अनेक सवाल उपस्थित केले जात होते. पण देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गटाच्या जागा या त्यांच्याच राहतील असे स्पष्ट केले आहे.


पुण्यातील पुरंदर तालुक्यातील कार्यक्रमाला आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हे विधान केले. एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत या मतदार संघाचे आमदार आहेत. त्यामुळे भाजप या जागांवर निवडणूक लढवणार का असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. त्यावेळी शिंदे गटाच्या जागा लढविण्याचा प्रश्नच येत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


दरम्यान भाजपच्या लोकसभा मिशनबाबत अधिक माहिती देताना, देवेंद्र फडणवीस यांनी हे मिशन भारतव्यापी त्याचप्रमाणे महाराष्ट्र व्यापीही असेल असे म्हटले. याचवेळी बारामती महाराष्ट्रात आहे, असा टोला त्यांनी लगावला.


भाजपसोबत एकनाथ शिंदे यांची खरी शिवसेना आहे. शिंदे गटाचे जे लोक आमच्याबरोबर आले आहेत. त्यांच्या जागेवर आम्ही दावा करणार नाही. शिवसेनेच्या उर्वरीत जागांबाबत एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जागेवर भाजप दावा करत असल्याच्या चर्चेत तथ्य नसल्याचे स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन

‘पीएनजी’ क्षेत्रातील नागरिकांना ३० जूननंतर ‘एलपीजी’ गॅस पुरवठा बंद; पर्यायी इंधन म्हणून केरोसीनचे वाटप होणार

मुंबई: राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी पीएनजी