त्रिपुरा, मेघालय व नागालँडमध्ये बिगुल वाजले!

Share

त्रिपुरामध्ये १६ फेब्रुवारीला तर मेघालय-नागालॅंडमध्ये २७ फेब्रुवारीला मतदान, निकाल २ मार्चला

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने बुधवारी त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडच्या विधानसभांच्या तारखा जाहीर केल्या. त्रिपुरामध्ये १६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. मेघालय आणि नागालँडमध्ये २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. सर्व राज्यांचे निकाल २ मार्च रोजी जाहीर होतील, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी बुधवारी दिली.

त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तिन्ही राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ मार्चमध्ये संपत आहे. तिन्ही राज्यांमध्ये ६०-६० सदस्यांच्या विधानसभा आहेत. नागालँड, मेघालय आणि त्रिपुरा या विधानसभेची मुदत अनुक्रमे १२ मार्च, १५ मार्च आणि २२ मार्च रोजी संपत आहे. या निवडणुकांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तिन्ही राज्यांमध्ये बहुमताचा आकडा ३१ आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, तिन्ही राज्यांमध्ये महिला मतदारांचा सहभाग जास्त आहे, येथे निवडणूक काळात हिंसाचाराच्या घटना आजपावेतो कमीच राहल्या. निष्पक्ष निवडणुकांसाठी आम्ही व आमची यंत्रणा या ठिकाणी कटिबद्ध आहोत.

मेघालयात २०१८ मध्ये ५९ जागांवर निवडणूक झाली. काँग्रेसला सर्वाधिक २१ जागा मिळाल्या होत्या. भाजपला येथे केवळ २ जागा मिळू शकल्या. नॅशनल पीपल्स पार्टीला (एनपीईपी) १९ जागा मिळाल्या. पीडीएफ आणि एचएसपीडीपीने मिळून सरकार स्थापन केले. त्यांनी मेघालय डेमोक्रेटिक अलायन्सची स्थापना केली. गेल्या तीन महिन्यांपासून येथील पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काँग्रेसने ४० आणि एनपीपीने ५८ उमेदवारांची यादी आधीच जाहीर केली आहे.

त्रिपुरा मध्ये २०१८ मध्ये ५९ जागांवर निवडणुका झाल्या. भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. ३५ जागा मिळाल्या. डाव्यांचा २५ वर्षांचा बालेकिल्ला भाजपने उद्ध्वस्त केला होता. यापूर्वी बिप्लब देव यांना मुख्यमंत्री करण्यात आले होते, परंतु मे २०२२ मध्ये माणिक साहा यांना मुख्यमंत्री करण्यात आले. आगामी निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी सीपीएम आणि काँग्रेसने हातमिळवणी केली आहे. ममता बॅनर्जींचा टीएमसी हा आणखी एक मोठा पक्ष आहे, जो भाजपला टक्कर देऊ शकतो.

नागालँडमध्ये नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे (एनडीपीपी) सरकार आहे. नेफियू रिओ हे मुख्यमंत्री आहेत. एनडीपीपी २०१७ मध्ये अस्तित्वात आला. २०१८ मध्ये दोन्ही पक्षांनी निवडणूकपूर्व युती केली होती. त्यानंतर एनडीपीपीने १८ तर भाजपने १२ जागा जिंकल्या. यानंतर एनडीपीपीने एनपीपी आणि जेडीयू सोबत सरकार स्थापन केले. गेल्या वर्षी दोन्ही पक्षांनी संयुक्त निवेदनात एनडीपीपी ४० आणि भाजप २० जागांवर एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते.

Recent Posts

दहशतवादी हल्ल्याने महाराष्ट्रावर पसरली शोककळा

डोंबिवलीवर शोकसागराचे सावट, पनवेलमध्ये दु:खाचा कल्लोळ तर पुण्यात अश्रूंच्या धारा मुंबई : काश्मीरच्या पहलगाम येथील…

8 minutes ago

CT Scan मुळे कर्करोग होऊ शकतो का? अमेरिकेतील एका नवीन अभ्यासात खुलासा

CT Scan Caused Cancer: सीटी स्कॅन हा शब्द प्रत्येकांनी कधी ना कधी ऐकला असेल, वेगवेगळ्या…

13 minutes ago

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंचा अ‍ॅक्शन मोड! अडकलेल्या पर्यटकांना आणण्यासाठी जम्मू-काश्मीरकडे रवाना

मुंबई : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे (Pehalgam Terror Attack) जगभरात एकच खळबळ…

39 minutes ago

NEET Student Suicide : ‘परीक्षा आणि कुटुंब जबाबदार नाहीत’ चिठ्ठी लिहित १८ वर्षीय विद्यार्थ्याने घेतला गळफास!

पटना : बिहारमधील एका नीटची (NEET) परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक…

55 minutes ago

प्रत्येक नागरिकाला सुखरुप घरी परत आणणे हीच प्राथमिकता – अजित पवार

मुंबई : पहलगाम (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मिरमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी…

1 hour ago

Pahalgam Terror Attack : पुन्हा सर्जिकल स्ट्राईक होणार? पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून राजनाथ सिंहांचा इशारा

नवी दिल्ली: पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात (Pahalgam Terror Attack) देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला…

1 hour ago