दुहेरी संकटामुळे टेन्शन वाढले! ठाकरेंचा पक्षप्रमुखपदाचा कार्यकाळ २३ जानेवारीला संपणार

  88

मुंबई : एकीकडे निवडणूक आयोगासमोर शिवसेना पक्ष कुणाचा यासाठी कायदेशीर लढाई सुरू आहे. तर दुसरीकडे पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ २३ जानेवारीला संपणार आहे. या दुहेरी संकटामुळे उद्धव ठाकरे यांचे टेन्शन वाढले असून ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे संघटनात्मक निवडणुकांसाठी विनंती केली आहे.


शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संघटनात्मक पक्षप्रमुखपदाची मुदत २३ जानेवारीला संपणार आहे. २३ जानेवारीला उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची ५ वर्षे पूर्ण होत आहेत. २३ जानेवारी २०१८ मध्ये कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख पदी निवड झाली होती. ही निवड ५ वर्षांसाठी असते. याच पार्श्वभूमीवर संघटनात्मक प्रमुख निवणुकीसाठी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला विनंती केली आहे. निवडणूक आयोग यावर काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.


शिवसेनेचा धनुष्यबाण कुणाच्या हाती जाणार? याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मंगळवारी शिंदे-ठाकरे या दोन्ही गटाने युक्तिवाद केला. आमदार-खासदारांचे बहुमत आमच्याकडेच असल्याने धनुष्यबाण आम्हाला मिळावे, असे शिंदे गटाने म्हटले आहे. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पद निर्माण करणे हे बेकायदेशीर होते. शिवसेनेची घटना बाळासाहेब ठाकरे केंद्रीत होती. घटनेत पक्षप्रमुख हे पद निर्माण करण्याची तरतूद नव्हती, असे सांगत शिंदे गटाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षप्रमुखपदावर प्रश्न उभे केले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंची पुन्हा या पदावर निवड करताना ठाकरे गटाला कसरत करावी लागणार आहे.


२०१८ साली उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुखपदावर निवड झाली होती. मात्र २०२३ मध्ये उद्धव ठाकरेंची निवड करताना संघटनात्मक निवडणुका घ्यावा लागतील. परंतु यंदा शिवसेनेत शिंदे-ठाकरे असे २ गट पडले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंना हे पद पुन्हा मिळवण्यासाठी अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता