दुहेरी संकटामुळे टेन्शन वाढले! ठाकरेंचा पक्षप्रमुखपदाचा कार्यकाळ २३ जानेवारीला संपणार

मुंबई : एकीकडे निवडणूक आयोगासमोर शिवसेना पक्ष कुणाचा यासाठी कायदेशीर लढाई सुरू आहे. तर दुसरीकडे पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ २३ जानेवारीला संपणार आहे. या दुहेरी संकटामुळे उद्धव ठाकरे यांचे टेन्शन वाढले असून ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे संघटनात्मक निवडणुकांसाठी विनंती केली आहे.


शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संघटनात्मक पक्षप्रमुखपदाची मुदत २३ जानेवारीला संपणार आहे. २३ जानेवारीला उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची ५ वर्षे पूर्ण होत आहेत. २३ जानेवारी २०१८ मध्ये कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख पदी निवड झाली होती. ही निवड ५ वर्षांसाठी असते. याच पार्श्वभूमीवर संघटनात्मक प्रमुख निवणुकीसाठी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला विनंती केली आहे. निवडणूक आयोग यावर काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.


शिवसेनेचा धनुष्यबाण कुणाच्या हाती जाणार? याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मंगळवारी शिंदे-ठाकरे या दोन्ही गटाने युक्तिवाद केला. आमदार-खासदारांचे बहुमत आमच्याकडेच असल्याने धनुष्यबाण आम्हाला मिळावे, असे शिंदे गटाने म्हटले आहे. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पद निर्माण करणे हे बेकायदेशीर होते. शिवसेनेची घटना बाळासाहेब ठाकरे केंद्रीत होती. घटनेत पक्षप्रमुख हे पद निर्माण करण्याची तरतूद नव्हती, असे सांगत शिंदे गटाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षप्रमुखपदावर प्रश्न उभे केले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंची पुन्हा या पदावर निवड करताना ठाकरे गटाला कसरत करावी लागणार आहे.


२०१८ साली उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुखपदावर निवड झाली होती. मात्र २०२३ मध्ये उद्धव ठाकरेंची निवड करताना संघटनात्मक निवडणुका घ्यावा लागतील. परंतु यंदा शिवसेनेत शिंदे-ठाकरे असे २ गट पडले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंना हे पद पुन्हा मिळवण्यासाठी अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.

Comments
Add Comment

मुंबई वॉटर मेट्रो जलवाहतूक प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुंबई : "मुंबई महानगर प्रदेशात जलप्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात

आमदार हेमंत पाटील यांनी मांडली 'लव्ह जिहाद' आणि 'लोकसंख्या नियंत्रणाची' आग्रही भूमिका

विधान परिषदेत धर्मांतर विरोधी विधेयकावर चर्चा मुंबई : विधान परिषदेत आज धर्मांतर विरोधी विधेयकावर अत्यंत

धर्मांतर हा श्रद्धेचा विषय, व्यवहाराचा नाही!"; विधान परिषदेत आमदार प्रवीण दरेकरांची ठाम भूमिका

मुंबई: "धर्म हा केवळ मानवी श्रद्धेचा भाग असून त्याचा व्यवहारासाठी किंवा स्वार्थासाठी वापर करणे चुकीचे आहे.

राज्यातील कालबाह्य ८० कायदे रद्द

विधेयक मंजूर; मुंबई फटक्यांची शिक्षा रद्द करण्याचा अधिनियम रद्द मुंबई : महाराष्ट्रातील कालबाह्य झालेले ८०

नायजेरियन नागरिकांविरोधात लवकरच धडक मोहीम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वैध कागदपत्रे नसलेल्यांना हद्दपार करणार मुंबई : राज्यात विशेषतः मुंबईनजीकच्या उपनगरांमध्ये बेकायदेशीरपणे

ड्रग्ज तस्करी रोखण्यासाठी कारवाईची वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षे करणार

मुंबई : अमली पदार्थांच्या तस्करीसाठी मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुलांचा उपयोग केला जात आहे. त्यामुळे याला पायबंद