आमदार बच्चू कडू यांना दुचाकीने ठोकले, डोक्याला ४ टाके पडले

  37

अमरावती : प्रहार संघटनेचे नेते व आमदार बच्चू कडू हे आज सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास रस्ता ओलांडत असताना एका दुचाकीस्वाराने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात त्यांच्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.


अपघातानंतर बच्चू कडू यांना तातडीने अमरावती येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बच्चू कडू यांच्या डोक्याला चार टाके पडले आहेत.


दरम्यान, बच्चू कडू यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे.


दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून नेते, आमदारांच्या अपघातांची मालिका सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी माणचे आमदार जयकुमार गोरे यांचा अपघात झाला होता. या अपघातात जखमी झालेले गोरे यांच्यावर अजूनही पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचाही अपघात झाला. त्यात धनंजय मुंडे यांच्या छातीला मार लागला. धनंजय मुंडे यांच्यावरही सध्या मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यानंतर रायगडच्या कशेडी घाटात आमदार योगेश कदम यांच्या कारला डंपरने धडक दिली होती. या धडकेत योगेश कदम यांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले होते. सुदैवाने योगेश कदम यांना अपघातात दुखापत झाली नाही.


त्यानंतर आज आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाला. विशेष म्हणजे बच्चू कडू मंगळवारीच मुंबईहून अमरावतीला आले होते. बच्चू कडू हे अचलपूर विधानसभा मतदारसंघातून (जि. अमरावती) सलग चौथ्यांदा निवडून आलेले अपक्ष आमदार आहेत. राज्यातील सत्तासंघर्षानंतर बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे.

Comments
Add Comment

मुख्याध्यापक लंके यांच्या बदलीविरोधात आंदोलन, शाळेला कुलुप लावण्याचा पालकांचा इशारा

नगर (प्रतिनिधी) – रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी लंके यांची

बीड विनयभंग प्रकरण: आरोपी विजय पवारवर आणखी गंभीर आरोप; एसआयटी चौकशीचे आदेश

बीड : बीड जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाने आता आणखी गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर १६ जुलैला होणार सुनावणी

नवी दिल्ली : शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने सर्वोच्च न्यायालयात पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत सुरू

विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आड लपून राजकारण करु नये

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी - उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई : शेतकरी

चंद्रपूरातील नाल्याच्या संरक्षण भिंतीचे प्रकरण विधानसभेत गाजले!

मुंबई: चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात हवेली गार्डन ते आकाशवाणी रोडवरील नाल्याच्या संरक्षण भिंतीच्या

कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी दरवर्षी करतात सहा हजाराहून अधिक वारकऱ्यांची सेवा

वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलसेवा, विठ्ठल मळ्यात जपलीय परंपरा..! १६ वर्षांची परंपरा; ४० दिंड्यांतील सहा हजार