आमदार बच्चू कडू यांना दुचाकीने ठोकले, डोक्याला ४ टाके पडले

Share

अमरावती : प्रहार संघटनेचे नेते व आमदार बच्चू कडू हे आज सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास रस्ता ओलांडत असताना एका दुचाकीस्वाराने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात त्यांच्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

अपघातानंतर बच्चू कडू यांना तातडीने अमरावती येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बच्चू कडू यांच्या डोक्याला चार टाके पडले आहेत.

दरम्यान, बच्चू कडू यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे.

दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून नेते, आमदारांच्या अपघातांची मालिका सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी माणचे आमदार जयकुमार गोरे यांचा अपघात झाला होता. या अपघातात जखमी झालेले गोरे यांच्यावर अजूनही पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचाही अपघात झाला. त्यात धनंजय मुंडे यांच्या छातीला मार लागला. धनंजय मुंडे यांच्यावरही सध्या मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यानंतर रायगडच्या कशेडी घाटात आमदार योगेश कदम यांच्या कारला डंपरने धडक दिली होती. या धडकेत योगेश कदम यांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले होते. सुदैवाने योगेश कदम यांना अपघातात दुखापत झाली नाही.

त्यानंतर आज आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाला. विशेष म्हणजे बच्चू कडू मंगळवारीच मुंबईहून अमरावतीला आले होते. बच्चू कडू हे अचलपूर विधानसभा मतदारसंघातून (जि. अमरावती) सलग चौथ्यांदा निवडून आलेले अपक्ष आमदार आहेत. राज्यातील सत्तासंघर्षानंतर बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे.

Recent Posts

गौतम गंभीरला ISIS Kashmir ने दिली ठार मारण्याची धमकी

नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस…

11 minutes ago

Health Tips: उन्हाळ्यात कशी घ्यावी त्वचेची काळजी ? जाणून घ्या

मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…

37 minutes ago

Health Tips: उन्हाळ्यात या घरगुती गोष्टी चेहऱ्यावर लावा!

दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…

2 hours ago

मोदी सरकार भारत – पाकिस्तान सीमा सील करण्यासाठी इस्रोच्या उपग्रहांची मदत घेणार

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…

2 hours ago

Pahalgam Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन पर्यटकांची पहिली तुकडी मुंबईत दाखल

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…

2 hours ago

RCB vs RR, IPL 2025: राजस्थान बेंगळुरूला पराभवाचा धक्का देणार!

मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…

3 hours ago