आमदार बच्चू कडू यांना दुचाकीने ठोकले, डोक्याला ४ टाके पडले

अमरावती : प्रहार संघटनेचे नेते व आमदार बच्चू कडू हे आज सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास रस्ता ओलांडत असताना एका दुचाकीस्वाराने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात त्यांच्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.


अपघातानंतर बच्चू कडू यांना तातडीने अमरावती येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बच्चू कडू यांच्या डोक्याला चार टाके पडले आहेत.


दरम्यान, बच्चू कडू यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे.


दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून नेते, आमदारांच्या अपघातांची मालिका सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी माणचे आमदार जयकुमार गोरे यांचा अपघात झाला होता. या अपघातात जखमी झालेले गोरे यांच्यावर अजूनही पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचाही अपघात झाला. त्यात धनंजय मुंडे यांच्या छातीला मार लागला. धनंजय मुंडे यांच्यावरही सध्या मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यानंतर रायगडच्या कशेडी घाटात आमदार योगेश कदम यांच्या कारला डंपरने धडक दिली होती. या धडकेत योगेश कदम यांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले होते. सुदैवाने योगेश कदम यांना अपघातात दुखापत झाली नाही.


त्यानंतर आज आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाला. विशेष म्हणजे बच्चू कडू मंगळवारीच मुंबईहून अमरावतीला आले होते. बच्चू कडू हे अचलपूर विधानसभा मतदारसंघातून (जि. अमरावती) सलग चौथ्यांदा निवडून आलेले अपक्ष आमदार आहेत. राज्यातील सत्तासंघर्षानंतर बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे.

Comments
Add Comment

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी