रत्नागिरी जिल्हयात कोरोना रुग्ण सापडला

मंडणगड येथील रुग्णाची अँटिजेन टेस्ट आली पॉझिटिव्ह


रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात पहिला कोरोना रुग्ण आढळल्याने आरोग्य प्रशासन खडबडून जागे झाले आहे. मंडणगड तालुक्यातील पाल्ये गावातील एका रुग्णाची अँटिजिन टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्याच्यावर दापोली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


चीनमध्ये हाहाकार उडालेला असताना आता महाराष्ट्रात रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणा पूर्णपणे अलर्ट मोडवर आहे. तुर्तास तरी कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही, पण काळजी घेणे आवश्यक आहे. या संशयित रुग्णाची आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी पाठवण्यात आली आहे, अशी अशी माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून देण्यात आली.


दरम्यान, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्यात पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्हात कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून आरोग्य विभागाने कंबर कसून कामाला लागले आहे.


कोकणातील मोठे रुग्णालय असलेल्या चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात रुग्णालय प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून मास्क लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment

कोकणाच्या विकासासाठी भाजपचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; जयगड बंदर बनणार अर्थव्यवस्थेचं केंद्र

रत्नागिरी: मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात