Raj Thackeray : राज ठाकरेंनी केली सिंधुदुर्ग जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त

  283

कुडाळ : कोकण दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे. राज ठाकरे यांचा दौरा पूर्वनियोजित असूनही पदाधिकाऱ्यांनी कोणतीही हालचाल केली नाही. कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांच्या दौऱ्याचा थांगपत्ताच नव्हता. परिणामी, राज ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मनसे कार्यकारिणी थेट बरखास्त केली. त्यामुळे राज ठाकरे यांच्या दौऱ्याची वेगळ्या अर्थाने जोरदार चर्चा सुरु आहे.


राज ठाकरे यांचा दौरा पूर्वनियोजित असल्याने कार्यकर्त्यांना या दौऱ्याची माहिती असणे अपेक्षित होते. परंतू, राज ठाकरे प्रत्यक्ष दौऱ्यावर येऊनही कार्यकर्त्यांना याबाबत माहिती असल्याची कोणतीच बाब दिसली नाही. परिणामी पक्षीय पातळीवर कडक पावले उचलत थेट कार्यकारिणीच बरखास्त करण्यात आली.


सिंधुदुर्ग जिल्हा मनसे कार्यकारिणी बरखास्त करण्याच्या निर्णयाची प्रसारमाध्यमांना माहिती देताना बाळा नांदगावकर यांनी सांगितले की, पक्षकार्य आणि संघटना याबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड अनास्था दिसत आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या आदेशाने कडक कारवाई करण्यात आली. पक्षप्रमुखांचा दौरा ८ ते १० दिवस अगोदर पूर्वनियोजित असूनही पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना कल्पना दिली नाही. ही बाब पदाधिकाऱ्यांमध्ये गांभीर्य नसल्याचेच दर्शवते. त्यामुळेच ही कारवाई करण्यात आली.


दरम्यान, मनसे संघटन चांगले असले तरी स्थानिक पातळीवर असलेले गटातटाचे राजकारण पक्षासाठी मारक ठरत आहे. त्यामुळे पक्षातील स्थानिक पातळीवरचे गट तट संपले पाहिजेत. त्याशिवाय पक्षवाढ होणार नाही. अनेक स्तरातील स्त्री-पूरुष पक्षासोबत येण्यास तयार आहेत. परंतू, असे असले तरी पदाधिकाऱ्यांमध्ये गट-तट असल्याने त्याचा मोठा फटका पक्षाला बसतो आहे. पक्षात स्थानिक पातळीवर गट तट असल्याचे पाहायला मिळत असले तरी, राज ठाकरे आपला कोकण दौरा पूर्ण करतील, असेही बाळा नांदगावकर म्हणाले.

Comments
Add Comment

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

रत्नागिरीत युनिट टेस्टमध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

रत्नागिरी जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षेतील कमी गुणांमुळे भविष्याच्या चिंतेतून आईने हटकले

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

माणगावमध्ये वाहतूककोंडी, ठिकठिकाणी पोलिस तैनात

मुंबईमधून गणपतीला कोकणात जाणाऱ्या गाड्यांमुळे सलग दुसऱ्या दिवशी माणगाव शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली