Doodle : गुगलच्या 'डूडल' स्पर्धेत कोलकाताचा श्लोक विजेता

कोलकाता (वृतसंस्था) : बालदिनानिमित्त गुगलने लहान मुलांकरिता 'डूडल' (Doodle) स्पर्धा घेतली होती. या स्पर्धेत कोलकाताचा श्लोक विजेता ठरला आहे. आज गुगल होमवर दिसणारे डूडल कोलकाता येथे राहणाऱ्या लहानग्या श्लोकने बनवले आहे.


बालदिनानिमित्त सर्च इंजिन गुगलने आपल्या होमपेजवर टायटलऐवजी खास डूडल डिस्प्ले केले आहे. गुगल नेहमीच वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने असे डूडल डिस्प्ले करत असतो. जे कंपनीच्या क्रिएटिव्ह टीमने डिझाइन केलेले असतात. मात्र आज गुगल होमवर दिसणारे डूडल कोलकाता येथे राहणाऱ्या लहानग्या श्लोकने बनवले आहे. श्लोकची 'डूडल फॉर गुगल' स्पर्धेचा विजेता म्हणून निवड झाली आहे. तसेच बालदिनी त्याला विशेष पारितोषिकही मिळाले आहे. श्लोक कोलकात्याच्या न्यू टाऊनमध्ये असलेल्या दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये शिकत आहे.


गुगल दरवर्षी डूडल स्पर्धेचे आयोजन करते. ज्यामध्ये लहान मुलांना त्यांची कल्पनाशक्ती आणि प्रतिभा दाखवण्याची संधी मिळते. डूडल फॉर गुगल स्पर्धेसाठी यंदा देशभरातील १,१५,००० मुलांनी भाग घेतला होता. त्यापैकी सर्वोत्तम डूडल निवडण्यासाठी ऑनलाइन मतदान करण्यात आली. कोलकाताचा विद्यार्थी श्लोक मुखर्जीच्या एंट्रीला विजेते म्हणून सर्वाधिक मते मिळाली. त्यानंतर त्याला विजेता म्हणून घोषित करण्यात आले आहे.


गुगलने दिलेल्या माहितीनुसार, यंदा देशभरातील १०० शहरांमधील इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना गुगल डूडल बनवण्याची संधी दिली. यंदाच्या स्पर्धेची थीम ‘कसा असेल माझा भारत पुढील २५ वर्षांत?’ ठेवण्यात आली होती. मुलांनी डूडलमध्ये २५ वर्षांनंतर भारताची कल्पना कशी केली आणि त्यांना कोणते बदल बघायचे आहेत, हे दाखवले. श्लोकने आपल्या चित्रात विज्ञान आणि निसर्ग यांच्यातील समतोल दाखवला आणि योग-आयुर्वेदाचाही समावेश त्यांनी आपल्या डूडल चित्रात केला आहे.



महत्वाच्या बातम्या…


T-20 World Cup : टी-२० विश्वचषक स्पर्धेत षटकार मारण्यात भारतीय संघ अव्वल

Comments
Add Comment

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी