रायगड जिल्ह्यातील ७६ तलावांचे संवर्धन

  281

अलिबाग (वार्ताहर) : पर्यावरण संतुलन व जैवविविधतेत तलाव, सरोवर व जलाशयांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे त्यांचे जतन करण्यासाठी शासनाने सरोवर संवर्धन अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ७६ तलावांमधील गाळ काढणे, सुशोभीकरण करणे, बळकटीकरण किंवा पुर्नजीवित करणे अशी कामे पूर्ण केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली.


सरोवर संवर्धन अभियानांतर्गत एक एकर क्षेत्राचे नवीन तलाव निर्मिती करणे, तसेच एक एकर क्षेत्रात अस्तित्त्वात असणार्या तलावातील गाळ काढणे, सुशोभीकरण करणे, बळकटीकरण किंवा पुनर्जीवित करणे यासह तलाव परिसरात वृक्ष लागवड, शौचालय व्यवस्था ही कामे करण्यात आली आहेत. या अभियानांतर्गत जिल्ह्यासाठी ७५ तलावांची कामे हाती घेण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तालुकास्तरावरुन अस्तित्त्वात असणारे १३३ तलावांची अमृत सरोवर पोर्टलवर नोंद करण्यात आली होती. त्यापैकी ग्रामस्थांच्या सहभागातून ग्रामपंचायत १५ व्या वित्त आयोग माध्यमातून आणि शासनाच्या विविध योजना, तसेच कंपन्यांच्या विकास निधीतून ७६ तलावांची कामे हाती घेण्यात आली होती. यासाठी लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, महिला बचत गट, नागरिक यांनी तलाव संवर्धन अभियानात आपला सक्रिय सहभाग नोंदविला होता.


या सर्वांच्या सहकार्याने जिल्ह्यातील ७६ तलावांचे संवर्धन करण्यात जिल्हा परिषद प्रशासनाला यश मिळाले. यासर्व कामांचे पूर्णत्वाचे प्रमाणपत्र जिल्हा मृद व जलसंधारण विभागाकडे सादर केले जाणार आहे. रायगड जिल्ह्यातील अमृत सरोवर अभियानांतर्गत रोहा तालुक्यातील १३ तलावांचे संवर्धन करण्यात आले, तर अलिबाग ४, कर्जत १, खालापूर ८, महाड ४, माणगाव ४, म्हसळा ६, मुरुड ६, पनवेल ९, पेण ४, पोलादपूर २, श्रीवर्धन ६, सुधागड ४, तळा १, उरण ४ तलावांचे संवर्धन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

अलिबाग-वडखळ मार्ग; आज-उद्या जड वाहनांची वाहतूक बंद

अलिबाग : जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकडे येणाऱ्या मोठ्या प्रमाणातील पर्यटकांच्या सुरक्षित प्रवासासाठी आणि

मुंबई गोवा महामार्गावरील माणगावसह इंदापूर बायपासचे काम तातडीने सुरू होणार

खासदार सुनील तटकरे यांचे आश्वासन माणगाव : मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव आणि इंदापूर येथील बायपासचे काम

माथेरान पर्यटनस्थळी वाहतूक कोंडीचा तिढा सुटणे आवश्यक

विकेंडला दस्तुरी नाक्यावर पार्किंगसाठी जागा उपलब्ध करणे गरजेचे माथेरान: दर विकेंडला माथेरानमध्ये

अखेर मुरुड आगारात पाच नवीन लालपरी दाखल

नांदगाव मुरुड : मुरुड या पर्यटन स्थळी एस टी आगारात जीर्ण झालेल्या बसेस मुळे स्थानिकांसह पर्यटकांमध्ये तीव्र

एसटी बसच्या एक्सलचे नट लुज; चालकांनी चालवली बस

श्रीवर्धन : मुंबईवरून बोर्लीकडे आलेली बस बोर्लीवरून आदगाव, सर्वे तसेच दिघीकडे मार्गस्थ होत असताना बोर्ली येथील

जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या पारदर्शकतेसाठी मेरी पंचायत अ‍ॅप

एका क्लिकवर ग्रामस्थांच्या कारभाराची माहिती अलिबाग : केंद्र व राज्य सरकारने ग्रामपंचायती अधिक बळकट करण्यावर भर