अखेर मुरुड आगारात पाच नवीन लालपरी दाखल

नांदगाव मुरुड : मुरुड या पर्यटन स्थळी एस टी आगारात जीर्ण झालेल्या बसेस मुळे स्थानिकांसह पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी होती. सर्वच स्तरातून सातत्याने नवीन बसेसची मागणी केली जात होती. अखेर स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रयत्नातून मुरुड आगाराला पाच नवीन लाल परी महामंडळाकडून देण्यात आल्या असून त्यांचे आ.दळवींच्या हस्ते शनिवारी सकाळी श्रीफळ वाढवून व फित कापुन त्यांचे लोकार्पण करण्यात आले.



मुरूड आगारात झालेल्या या शानदार सोहळ्याला पेणचे विभागीय नियंत्रक दिपक घोडे, यंत्र अभियंता संदीप शिंदे, आगार व्यवस्थापक राहुल शिंदे,शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख भरत बेलोसे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार महेंद्र दळवी म्हणाले की,मुरुडकरांची कित्येक वर्षाची नवीन बसेसची मागणी पूर्ण करताना आनंद होतो. पर्यटनस्थळी प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्य मंत्री व परिवहनमंत्र्यांकडे आपण सतत पाठपुरावा केला होता, साळाव पुलाची दुरुस्ती झाली.


त्यामुळे नवीन बसेसना त्यावरुन जाण्यासाठी कार्यकारी अभियंता एम. एम धायतडक यांनी आता एसटी नियंत्रकांना परवानगीचे पत्र दिल्याचेही सांगितले. प्रत्येक डेपोसाठी मेघा भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. येणाऱ्या अधिवेशनात मुरुड आगाराचा विशेष उल्लेख करुन त्याला भरघोस निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन त्यांनी दिले.

Comments
Add Comment

Murud-Janjira Fort : मुरुड-जंजिरा किल्ल्यावर आता 'हायटेक' जेट्टी

मुरुड-जंजिरा : जागतिक पर्यटनाच्या नकाशावर असलेल्या ऐतिहासिक जंजिरा जलदुर्ग किल्ल्याच्या दर्शनासाठी येणाऱ्या

Raigad : भरडखोल बंदर प्रकल्पामुळे मच्छीमारांना मिळणार अत्याधुनिक सुविधा

श्रीवर्धन : महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या सोयीसुविधांमध्ये वाढ करण्यासाठी आणि मत्स्यव्यवसायाला चालना

Raigad : रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील : पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई: रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या पर्यटनांच्या कामांना गती

Tourists on Raigad's Beaches : रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची विक्रमी गर्दी; समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरले

रायगड : महाराष्ट्र दिनाची सुट्टी, त्याला जोडून आलेला शनिवार-रविवार आणि शाळांच्या परीक्षा संपल्यानंतर लागलेल्या

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात, २५ वर्षीय चालकाचा चिरडून मृत्यू

श्रीवर्धन – श्रीवर्धन येथे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. म्हसळा

रायगड जिल्ह्यातील अंबा व कुंभे उदंचन जलविद्युत प्रकल्प क्षमतावाढीसाठी CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'एनटीपीसी'शी सुधारित सामंजस्य करार

मुंबई : एनटीपीसी लिमिटेडच्या रायगड जिल्ह्यातील कुंभे व अंबा उदंचन जलविद्युत प्रकल्पांच्या स्थापित