माथेरान पर्यटनस्थळी वाहतूक कोंडीचा तिढा सुटणे आवश्यक

विकेंडला दस्तुरी नाक्यावर पार्किंगसाठी जागा उपलब्ध करणे गरजेचे


माथेरान: दर विकेंडला माथेरानमध्ये मर्यादेपेक्षाही अधिक पर्यटकांची गर्दी होताना दिसते. स्वतःची वाहने आणणाऱ्या पर्यटकांना दस्तुरी नाक्यावर पार्किंगसाठी जागा अपुरी पडत असल्याने वाहतुकीची कोंडी पहावयास मिळत आहे. लवकरच यावर तोडगा काढला पाहिजे अशी पर्यटकांमधून मागणी केली जात आहे.


काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी श्रमदान करून काहीअंशी पार्किंगचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला होता; परंतु माथेरानकडे पर्यटकांचा ओघ विकेंडला वाढतच असल्यामुळे दस्तुरी नाक्यावर शासकीय अधिकारी वर्गाला सुद्धा वाहनांना वाहतुकीसाठी मार्ग काढून देणे त्रासदायक बनलेले आहे. पार्किंगच्या ठिकाणी झाडांच्या भोवताली जांभ्या दगडांचे कठडे बांधले आहेत. त्यामुळे जागा व्यापलेली आहे. पार्किंगच्या जागेत जे काही अडथळे निर्माण झाले आहेत ते काढून टाकल्यास वाहनांची पार्किंग सुरळीतपणे होऊ शकते.


जवळपास सर्व जागाही वनखात्याच्या अखत्यारीत येत आहे आणि नगरपालिकासुद्धा वाहन कर आकारणी करते. त्यामुळे या दोन्ही खात्यांनी मिळून पार्किंगसाठी जागा उपलब्ध करणे आवश्यक आहे. तेव्हाच वाहतूक कोंडी संपुष्टात येईल असे बोलले जात आहे.

Comments
Add Comment

Murud-Janjira Fort : मुरुड-जंजिरा किल्ल्यावर आता 'हायटेक' जेट्टी

मुरुड-जंजिरा : जागतिक पर्यटनाच्या नकाशावर असलेल्या ऐतिहासिक जंजिरा जलदुर्ग किल्ल्याच्या दर्शनासाठी येणाऱ्या

Raigad : भरडखोल बंदर प्रकल्पामुळे मच्छीमारांना मिळणार अत्याधुनिक सुविधा

श्रीवर्धन : महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या सोयीसुविधांमध्ये वाढ करण्यासाठी आणि मत्स्यव्यवसायाला चालना

Raigad : रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील : पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई: रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या पर्यटनांच्या कामांना गती

Tourists on Raigad's Beaches : रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची विक्रमी गर्दी; समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरले

रायगड : महाराष्ट्र दिनाची सुट्टी, त्याला जोडून आलेला शनिवार-रविवार आणि शाळांच्या परीक्षा संपल्यानंतर लागलेल्या

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात, २५ वर्षीय चालकाचा चिरडून मृत्यू

श्रीवर्धन – श्रीवर्धन येथे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. म्हसळा

रायगड जिल्ह्यातील अंबा व कुंभे उदंचन जलविद्युत प्रकल्प क्षमतावाढीसाठी CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'एनटीपीसी'शी सुधारित सामंजस्य करार

मुंबई : एनटीपीसी लिमिटेडच्या रायगड जिल्ह्यातील कुंभे व अंबा उदंचन जलविद्युत प्रकल्पांच्या स्थापित