एसटी बसच्या एक्सलचे नट लुज; चालकांनी चालवली बस

श्रीवर्धन : मुंबईवरून बोर्लीकडे आलेली बस बोर्लीवरून आदगाव, सर्वे तसेच दिघीकडे मार्गस्थ होत असताना बोर्ली येथील जागृत नागरिकांच्या कर्तव्य दक्षतेमुळे मोठी दुर्घटना होताना टळली आहे.


सदरील बस बोर्ली स्थानकामध्ये उभी असताना मागील टायरचे एक्सेलचे नट लूज असल्याचे निदर्शनास आले. यानंतर चालकाला कल्पना देऊन बस बाजूला लावण्यास सांगितले. डिप्रेशनच्या सहाय्याने टायरला फिरवण्याचे काम करणाऱ्या एक्सलला एकूण ८ नट असतात. त्यापैकी फक्त ३ नट एक्सलला लागले होते. तर बाकीचे ५ नट पडून गेले होते. तसेच असलेले ३ नट सुद्धा हाताने फिरत होते. बसची अशी अवस्था असताना बस का बरं सोडण्यात आली होती.


हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. यामध्ये चालकाचा सुद्धा हलगर्जीपणा दिसून येत आहे. बस मुबईकडून श्रीवर्धनकडे येताना पनवेल, पेण तसेच इतर पुढील स्थानकांत थांबली होती. यावेळी चालकांनी याकडे लक्ष दिले नाही का? दिले असेल तर याची कल्पना संबंधित विभागाकडे दिली होती का याची नोंद करण्यात आली आहे का? ही बस श्रीवर्धनकडे येताना वेडी-वाकडी वळणे, चढ-उतार घेत येते.


याठिकाणी एक्सल बाहेर पडला असता तर चालकाला बस नियंत्रणात आणणे शक्य झाले असते का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी अनुचित घटना घडली नाही म्हणून विषय सोडून देण्यापेक्षा प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कारवाई सुद्धा झाली पाहिजे अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

Comments
Add Comment

Murud-Janjira Fort : मुरुड-जंजिरा किल्ल्यावर आता 'हायटेक' जेट्टी

मुरुड-जंजिरा : जागतिक पर्यटनाच्या नकाशावर असलेल्या ऐतिहासिक जंजिरा जलदुर्ग किल्ल्याच्या दर्शनासाठी येणाऱ्या

Raigad : भरडखोल बंदर प्रकल्पामुळे मच्छीमारांना मिळणार अत्याधुनिक सुविधा

श्रीवर्धन : महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या सोयीसुविधांमध्ये वाढ करण्यासाठी आणि मत्स्यव्यवसायाला चालना

Raigad : रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील : पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई: रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या पर्यटनांच्या कामांना गती

Tourists on Raigad's Beaches : रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची विक्रमी गर्दी; समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरले

रायगड : महाराष्ट्र दिनाची सुट्टी, त्याला जोडून आलेला शनिवार-रविवार आणि शाळांच्या परीक्षा संपल्यानंतर लागलेल्या

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात, २५ वर्षीय चालकाचा चिरडून मृत्यू

श्रीवर्धन – श्रीवर्धन येथे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. म्हसळा

रायगड जिल्ह्यातील अंबा व कुंभे उदंचन जलविद्युत प्रकल्प क्षमतावाढीसाठी CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'एनटीपीसी'शी सुधारित सामंजस्य करार

मुंबई : एनटीपीसी लिमिटेडच्या रायगड जिल्ह्यातील कुंभे व अंबा उदंचन जलविद्युत प्रकल्पांच्या स्थापित