जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या पारदर्शकतेसाठी मेरी पंचायत अ‍ॅप

एका क्लिकवर ग्रामस्थांच्या कारभाराची माहिती


अलिबाग : केंद्र व राज्य सरकारने ग्रामपंचायती अधिक बळकट करण्यावर भर दिल्याने आता ग्रामपंचायतीच्या विकासासाठीही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊ लागला आहे. त्यामुळेच ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता असावी व या सर्व कारभाराची माहिती ग्रामस्थांना एका क्लिकवर उपलब्ध व्हावी, यासाठी पंचायतराज मंत्रालयाने तंत्रज्ञानाचे एक पाऊल पुढे टाकत 'मेरी पंचायत' हे अ‍ॅप आणले आहे. या अ‍ॅपमुळे गावच्या कारभाराची सर्व माहिती प्रत्येक ग्रामस्थाला सहज पाहता येणार आहे.



डिजिटल युगात आता स्थानिक स्वराज्य संस्थाही मागे नाहीत, हे 'मेरी पंचायत' अ‍ॅपने दाखवून दिले आहे. ग्रामपंचायतींचा विकास झपाट्याने होऊ लागलेला असून, केंद्र व राज्य सरकारकडून आता पंचायतींना थेट निधी मिळू लागला आहे. या निधीमुळे ग्रामीण प्रशासन गावातील कामे सहजरित्या किती निधी उपलब्ध झाला आहे, गावामध्ये सध्या कोणकोणती कामे सुरू आहेत, कोपणकोणत्या योजना सुरू आहेत, याची सर्व माहिती अ‍ॅपद्वारे प्रत्येकाला मिळू शकेल, ग्रामस्थांना ही माहिती मिळवण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये हेलपाटे घालावे लागणार नाहीत.


केवळ माहितीच नाही, तर अ‍ॅपच्या माध्यमातून संपूर्ण ग्रामपंचायतीचा सामाजिक व आर्थिक लेखाजोखा देखील तपासून पाहता येणे शक्य होणार आहे.



ग्रामपंचायतीमधील संख्या, समित्यांची सदस्य माहिती, समित्यांचे अध्यक्ष, नोटीस बोर्ड, ग्रामपंचायतीला मिळणारे अनुदान याबरोबरच ग्रामपंचायतीची एकूण बँक खाती किती आहेत, त्यामध्ये शिल्लक रक्कम व प्रत्येक कामासाठी खर्च झालेली रक्कम याशिवाय कामाची सद्यस्थिती, वेगवेगळी देयके, पाण्याचे स्रोत, नळजोडणी, पाणीतपासणी अशी सविस्तर माहिती प्रत्येक ग्रामस्थाला अ‍ॅपवर पाहता येणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभाराची सर्व कुंडलीच ग्रामस्थांपुढे उघड होणार आहे. गावांच्या विकासाभर भर देण्यासाठी सरकारकडून विविध उपक्रम राबवण्यात येत असून, मेरी पंचायत'मुळे कारभार अधिकाधिक पारदर्शक होणार आहे.

Comments
Add Comment

Dam Water Levels : रायगड जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा अलिबाग : रायगड जिल्ह्यात मागील

RTI : माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्र शासनाचे नवे नियम लागू

रायगड : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदारांसाठी महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल लागू केले

Nitesh Rane : रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांच्या समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करा

मुंबई,  : रायगड जिल्ह्यातील आरसीएफ कंपनीच्या मरीन आउटफॉल लाईनमुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक

Ashish Shelar : रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी समन्वित कृती आराखडा तयार करून कामांना गती द्या

मुंबई,: रायगड किल्ल्याच्या संवर्धन व विकासासाठी राज्य शासनाकडून निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही.

Raigad Accident : रत्नागिरीत जयगड जेसडब्ल्यू पोर्टवर ४५ मीटर उंचीवरून कोसळून कामगाराचा मृत्यू

रत्नागिरी : जयगड येथील जेएसडब्ल्यू पोर्टवर काम करणाऱ्या एका ३७ वर्षीय कामगाराचा ४५ मीटर उंचीवरून खाली पडून

Raigad Crime : पत्नी व दोन मुलींच्या मृत्यूप्रकरणी पतीला अटक; माणगाव पोलिसांची कारवाई

रायगड : माणगाव तालुक्यातील खरवली आदिवासीवाडी येथे घडलेल्या धक्कादायक कौटुंबिक दुर्दैवी घटनेप्रकरणी माणगाव