जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या पारदर्शकतेसाठी मेरी पंचायत अ‍ॅप

एका क्लिकवर ग्रामस्थांच्या कारभाराची माहिती


अलिबाग : केंद्र व राज्य सरकारने ग्रामपंचायती अधिक बळकट करण्यावर भर दिल्याने आता ग्रामपंचायतीच्या विकासासाठीही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊ लागला आहे. त्यामुळेच ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता असावी व या सर्व कारभाराची माहिती ग्रामस्थांना एका क्लिकवर उपलब्ध व्हावी, यासाठी पंचायतराज मंत्रालयाने तंत्रज्ञानाचे एक पाऊल पुढे टाकत 'मेरी पंचायत' हे अ‍ॅप आणले आहे. या अ‍ॅपमुळे गावच्या कारभाराची सर्व माहिती प्रत्येक ग्रामस्थाला सहज पाहता येणार आहे.



डिजिटल युगात आता स्थानिक स्वराज्य संस्थाही मागे नाहीत, हे 'मेरी पंचायत' अ‍ॅपने दाखवून दिले आहे. ग्रामपंचायतींचा विकास झपाट्याने होऊ लागलेला असून, केंद्र व राज्य सरकारकडून आता पंचायतींना थेट निधी मिळू लागला आहे. या निधीमुळे ग्रामीण प्रशासन गावातील कामे सहजरित्या किती निधी उपलब्ध झाला आहे, गावामध्ये सध्या कोणकोणती कामे सुरू आहेत, कोपणकोणत्या योजना सुरू आहेत, याची सर्व माहिती अ‍ॅपद्वारे प्रत्येकाला मिळू शकेल, ग्रामस्थांना ही माहिती मिळवण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये हेलपाटे घालावे लागणार नाहीत.


केवळ माहितीच नाही, तर अ‍ॅपच्या माध्यमातून संपूर्ण ग्रामपंचायतीचा सामाजिक व आर्थिक लेखाजोखा देखील तपासून पाहता येणे शक्य होणार आहे.



ग्रामपंचायतीमधील संख्या, समित्यांची सदस्य माहिती, समित्यांचे अध्यक्ष, नोटीस बोर्ड, ग्रामपंचायतीला मिळणारे अनुदान याबरोबरच ग्रामपंचायतीची एकूण बँक खाती किती आहेत, त्यामध्ये शिल्लक रक्कम व प्रत्येक कामासाठी खर्च झालेली रक्कम याशिवाय कामाची सद्यस्थिती, वेगवेगळी देयके, पाण्याचे स्रोत, नळजोडणी, पाणीतपासणी अशी सविस्तर माहिती प्रत्येक ग्रामस्थाला अ‍ॅपवर पाहता येणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभाराची सर्व कुंडलीच ग्रामस्थांपुढे उघड होणार आहे. गावांच्या विकासाभर भर देण्यासाठी सरकारकडून विविध उपक्रम राबवण्यात येत असून, मेरी पंचायत'मुळे कारभार अधिकाधिक पारदर्शक होणार आहे.

Comments
Add Comment

Ashok Kharat Case : भोंदू खरातचा उरणमध्ये जमीन खरेदी विक्रीत कोट्यवधींचा झोलझाल

रायगड : अशोक खरात केसमध्ये हे प्रकरण किती खोल आहे याचा अंदाज महाराष्ट्राला येत जात आहे, अशोक खरातचे काळे धंदे करत

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज

GI Tag White Onion Production : जीआय टॅग मिळूनही अडचण; पांढऱ्या कांद्याच्या उत्पादनात मोठी घट

रायगड : बदलत्या हवामानाचा मोठा फटका यंदा अलिबाग तालुक्यातील पांढरा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. यावर्षी

Mumbai Goa Expressway : कोकणात विकेंड रश; मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

माणगाव : उन्हाळी सुट्ट्यांची सुरुवात आणि सलग तीन दिवसांचा विकेंड यामुळे कोकणाच्या दिशेने पर्यटकांचा ओघ प्रचंड

मुंबई-गोवा महामार्गावर बस उलटून भीषण अपघात; ३८ प्रवासी जखमी दोघांचा मृत्यू

नागोठणे : शुक्रवारी ( ३ एप्रिल ) मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका खासगी बसचा मुंबई गोवा महामार्गावर अपघात झाला.

कोकणातील दुर्गम भागात ऊर्जेचे नवे पर्व

लघु जलविद्युत विकास योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी अलिबाग : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या