राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमासाठी “निक्षय मित्र” व्हा!

अलिबाग (वार्ताहर) : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम स्थानिक पातळीवर राबविण्यासाठी त्याला जनतेचा तसेच विविध संस्थेचा सहभाग देखील तेवढाच महत्वाचा असतो. त्यामुळे सहकारी कॉर्पोरेट, निवडून आलेले प्रतिनिधी, वैयक्तिक संस्था आदी संस्थांनी क्षयरुग्णांना सहाय्य करण्यासाठी 'निक्षय मित्र’ बनावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.


केंद्र शासनाने प्रधानमंत्री टी.बी. मुक्त भारत अभियान सुरु केले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ९ सप्टेंबर २०२२ रोजी “प्रधानमंत्री टी.बी. मुक्त भारत अभियान” या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ केला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना, संस्थांना क्षयरोग मुक्त भारत बनण्यासाठी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहनही केले आहे. यामध्ये निक्षय मित्रांच्यामार्फत क्षयरुग्णांना सहा महिने ते तीन वर्षांसाठी कोरडा आहार पुरविण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

टाटा मिनी बसचा अपघात, गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला निघालेल्या दोघांचा मृत्यू

कर्जत : समृद्धी महामार्गावर कर्जतजवळ बोगद्यात टाटा मिनी बसचा अपघात झाला. चालकाला डुलकी लागल्यामुळे त्याचे

अरे बापरे! मांडवा जेट्टीच्या नव्या पुलाचे खांब निकामी होण्याच्या मार्गावर; जेट्टी कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता

लोखंडी सळ्याही आल्या बाहेर, मूलभूत सुविधांचाही अभाव अलिबाग : गेटवे-मुंबई ते मांडवा-अलिबागला जलमार्गाने

रायगड जिल्ह्यात भरदिवसा घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

अलिबाग  : आलिशान चारचाकी वाहनाने रेकी करून रायगड जिल्ह्यात भरदिवसा घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे हाल

कर्जत : ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कर्जत - सीएसएमटी (मुंबई सीएसएमटी किंवा छत्रपती

ताम्हिणी घाटात भीषण अपघात, दरड गाडीवर कोसळल्याने महिलेचा मृत्यू!

रायगड: सनरुफ असलेल्या आलिशान चारचाकीवर दरड कोसळल्याची घटना पुणे-माणगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात घडली आहे. ही

इंदापूर-कशेडी दरम्यान ९ महिन्यांत ३६ जणांचा मृत्यू

मुंबई - गोवा महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरण कामाचा फटका अलिबाग  : मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या