आयटीआय परिसरात बिबट्या असल्याचा संशय

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे वनविभागाचे आवाहन


रोहा : नागोठणे येथील शासकीय औद्योगिक शिक्षण संस्थेच्या परिसरात काही दिवसांपासून बिबट्याच वावर असल्याच्या चर्चेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.मात्र वनविभागाने केलेल्या सखोल तपासणीनंतर हे दावे फेटाळून लावत नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.


भविष्यातील अशा घटनांची शहानिशा करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याची गरज आता प्रकर्षाने दिसत आहे. नागोठणे येथील आद्य क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके शासकीय औद्योगिक प्रशिक्षन प्राचार्यांनी २९ डिसेंबर २०२५ रोजी वन विभागाला एक पत्र लिहिले होते. या पत्रात नमूद करण्यात आले होते की, संस्थेच्या परिसरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे दिसून येत आहे. इतकेच नव्हेतर बिबट्याच्या पायांचे ठसे असल्याचा दावाही करण्यात आला होता. या परिसरात सुमारे चारशे ते साडेचारशे प्रशिक्षणार्थी शिक्षण घेत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे म्हटले होते. वनविभागाने प्राचार्यांच्या विनंतीची दखल घेत वनपरिक्षेत्र अधिकारी नागोठणे यांनी ३० डिसेंबर २०२५ रोजी तातडीने बचाव पथकासह घटनास्थळाची पाहणी केली. सागर दहिवेकर आणि त्यांच्या पथकाने आयटीआय कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत संपूर्ण परिसराची आणि त्यांनी दाखवलेल्या ठशांची सूक्ष्म तपासानंतर ते ठसे मुळातच बिबट्याचे किंवा कोणत्या इतर हिंसक प्राण्याचे नव्हते. त्यामुळे या परिसरात बिबट्याचा वावर असल्याची माहिती केवल एक अफवा असल्याचे वन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. वन विभागाने प्रशासकाला लेखी स्वरूपात कळविले की, अशा प्रकारच्या खोट्या अफवा पसरवू नयेत, जर भविष्यात कोणताही वन्यप्राणी खरोखर दिसून आल्यास तत्काळ वन विभागाशी संपर्क साधावा असेही त्यांनी सुचित केले आहे. खोट्या अफवा पसरवणाऱ्यांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब कुकडे यांनी दिला आहे.

Comments
Add Comment

Raigad Crime : सोन्याच्या दागिन्यांसाठी महिलेचे अपहरण करून खून; दोघांना अटक

रायगड : सोन्याच्या दागिन्यांच्या लालसेपोटी एका महिलेचे अपहरण करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना मांडवा

Minister Adv. Ashish Shelar : रायगडावरील सुविधांची सामूहिक पाहणी करून व्यापक आराखडा ठरविणार

मुंबई,  : रायगड किल्ला परिसरातील विकासकामे, जनसुविधा, स्वच्छता व्यवस्था, पाणीपुरवठा तसेच रायगड विकास

रायगड सज्ज! शिवराज्याभिषेकाच्या ३५३ व्या वर्धापन दिनासाठी ५ आणि ६ जूनला भव्य सोहळा

Mumbai-Goa Highway Accident : उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक; दोन जणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर...

पोलादपूर: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. पोलादपूरजवळ झालेल्या या अपघातात दोन

Raigad Crime :मुंबईकर मुलीची माणगावमध्ये निर्घृण हत्या, मृतदेह जंगलात फेकला, परिसरात भीतीचं वातावरण

MANGAON : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात एका १५ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून

Accident In Ambenali Ghat : आंबेनळी घाटात खोलवर सापडले आठ तरुणांचे मृतदेह आणि..., रेस्क्यू टीमने दिली धक्कादायक माहिती

रायगड : रायगड आणि सातारा या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील धोकादायक आंबेनळी घाटात