आयटीआय परिसरात बिबट्या असल्याचा संशय

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे वनविभागाचे आवाहन


रोहा : नागोठणे येथील शासकीय औद्योगिक शिक्षण संस्थेच्या परिसरात काही दिवसांपासून बिबट्याच वावर असल्याच्या चर्चेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.मात्र वनविभागाने केलेल्या सखोल तपासणीनंतर हे दावे फेटाळून लावत नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.


भविष्यातील अशा घटनांची शहानिशा करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याची गरज आता प्रकर्षाने दिसत आहे. नागोठणे येथील आद्य क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके शासकीय औद्योगिक प्रशिक्षन प्राचार्यांनी २९ डिसेंबर २०२५ रोजी वन विभागाला एक पत्र लिहिले होते. या पत्रात नमूद करण्यात आले होते की, संस्थेच्या परिसरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे दिसून येत आहे. इतकेच नव्हेतर बिबट्याच्या पायांचे ठसे असल्याचा दावाही करण्यात आला होता. या परिसरात सुमारे चारशे ते साडेचारशे प्रशिक्षणार्थी शिक्षण घेत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे म्हटले होते. वनविभागाने प्राचार्यांच्या विनंतीची दखल घेत वनपरिक्षेत्र अधिकारी नागोठणे यांनी ३० डिसेंबर २०२५ रोजी तातडीने बचाव पथकासह घटनास्थळाची पाहणी केली. सागर दहिवेकर आणि त्यांच्या पथकाने आयटीआय कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत संपूर्ण परिसराची आणि त्यांनी दाखवलेल्या ठशांची सूक्ष्म तपासानंतर ते ठसे मुळातच बिबट्याचे किंवा कोणत्या इतर हिंसक प्राण्याचे नव्हते. त्यामुळे या परिसरात बिबट्याचा वावर असल्याची माहिती केवल एक अफवा असल्याचे वन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. वन विभागाने प्रशासकाला लेखी स्वरूपात कळविले की, अशा प्रकारच्या खोट्या अफवा पसरवू नयेत, जर भविष्यात कोणताही वन्यप्राणी खरोखर दिसून आल्यास तत्काळ वन विभागाशी संपर्क साधावा असेही त्यांनी सुचित केले आहे. खोट्या अफवा पसरवणाऱ्यांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब कुकडे यांनी दिला आहे.

Comments
Add Comment

RTI : माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्र शासनाचे नवे नियम लागू

रायगड : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदारांसाठी महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल लागू केले

Nitesh Rane : रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांच्या समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करा

मुंबई,  : रायगड जिल्ह्यातील आरसीएफ कंपनीच्या मरीन आउटफॉल लाईनमुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक

Ashish Shelar : रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी समन्वित कृती आराखडा तयार करून कामांना गती द्या

मुंबई,: रायगड किल्ल्याच्या संवर्धन व विकासासाठी राज्य शासनाकडून निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही.

Raigad Accident : रत्नागिरीत जयगड जेसडब्ल्यू पोर्टवर ४५ मीटर उंचीवरून कोसळून कामगाराचा मृत्यू

रत्नागिरी : जयगड येथील जेएसडब्ल्यू पोर्टवर काम करणाऱ्या एका ३७ वर्षीय कामगाराचा ४५ मीटर उंचीवरून खाली पडून

Raigad Crime : पत्नी व दोन मुलींच्या मृत्यूप्रकरणी पतीला अटक; माणगाव पोलिसांची कारवाई

रायगड : माणगाव तालुक्यातील खरवली आदिवासीवाडी येथे घडलेल्या धक्कादायक कौटुंबिक दुर्दैवी घटनेप्रकरणी माणगाव

Raigad Accident : जेएनपीटी परिसरात भीषण स्फोट; दोन कामगारांचा मृत्यू

रायगड : जेएनपीटी परिसरातील जेएसडब्ल्यू ऑइल जेट्टीवर रविवारी सकाळी झालेल्या भीषण स्फोटात दोन कामगारांचा