विकास गोगावलेंना तडीपार करण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षकांना निवेदन

अलिबाग : मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र आणि युवासेना कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले यांच्यावर कारवाईसाठी विरोधक आक्रमक झाले असून, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकास गोगावले यांना तडीपार करण्याची मागणी निवेदनाद्वारे महाडमधील लोकप्रतिनिधींनी शिष्टमंडळाद्वारे रायगड पोलीस अधिक्षक यांच्याकडे सोमवारी केली.


महाड नगरपालिका निवडणुकीत मतदानाच्या दिवशी विकास गोगावले यांच्याकडून सुशांत जाबरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण करण्यात आली. ज्यामुळे मतदारांमध्ये दहशत निर्माण झाली होती. या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर विकास गोगावले यांच्यावर यापूर्वी अन्य तीन गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद विविध पोलीस ठाण्यात आहे. ज्यात महाड शहर पोलीस ठाण्यात दोन, तर गोरेगाव पोलीस ठाण्यात एका गुन्ह्याचा समावेश आहे. या चार गुन्ह्यांची दखल घेऊन त्यांना तडीपार करण्याची मागणी या शिष्टमंडळाकडून करण्यात आली. जानेवारी २०२६ या महिन्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विकास गोगावले यांच्याकडून या निवडणुकीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.आगामी निवडणुका शांततापूर्ण आणि निष्पक्षपणे पार पाडण्याच्या दृष्टीने विकास गोगावले यांच्यावर निवडणुका होईपर्यंत हद्दपार करावे, अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Minister Adv. Ashish Shelar : रायगडावरील सुविधांची सामूहिक पाहणी करून व्यापक आराखडा ठरविणार

मुंबई,  : रायगड किल्ला परिसरातील विकासकामे, जनसुविधा, स्वच्छता व्यवस्था, पाणीपुरवठा तसेच रायगड विकास

रायगड सज्ज! शिवराज्याभिषेकाच्या ३५३ व्या वर्धापन दिनासाठी ५ आणि ६ जूनला भव्य सोहळा

Mumbai-Goa Highway Accident : उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक; दोन जणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर...

पोलादपूर: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. पोलादपूरजवळ झालेल्या या अपघातात दोन

Raigad Crime :मुंबईकर मुलीची माणगावमध्ये निर्घृण हत्या, मृतदेह जंगलात फेकला, परिसरात भीतीचं वातावरण

MANGAON : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात एका १५ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून

Accident In Ambenali Ghat : आंबेनळी घाटात खोलवर सापडले आठ तरुणांचे मृतदेह आणि..., रेस्क्यू टीमने दिली धक्कादायक माहिती

रायगड : रायगड आणि सातारा या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील धोकादायक आंबेनळी घाटात

जहाज बांधणी क्षेत्रात २०३० पर्यंत ४० हजार नोकऱ्या- मंत्री नितेश राणे

रत्नागिरी, रायगड आणि पालघरच्या किनाऱ्यावर उभे राहणार विशाल 'शिप बिल्डिंग' प्रकल्प मुंबई (सुहास शेलार) :