विकास गोगावलेंना तडीपार करण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षकांना निवेदन

अलिबाग : मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र आणि युवासेना कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले यांच्यावर कारवाईसाठी विरोधक आक्रमक झाले असून, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकास गोगावले यांना तडीपार करण्याची मागणी निवेदनाद्वारे महाडमधील लोकप्रतिनिधींनी शिष्टमंडळाद्वारे रायगड पोलीस अधिक्षक यांच्याकडे सोमवारी केली.


महाड नगरपालिका निवडणुकीत मतदानाच्या दिवशी विकास गोगावले यांच्याकडून सुशांत जाबरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण करण्यात आली. ज्यामुळे मतदारांमध्ये दहशत निर्माण झाली होती. या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर विकास गोगावले यांच्यावर यापूर्वी अन्य तीन गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद विविध पोलीस ठाण्यात आहे. ज्यात महाड शहर पोलीस ठाण्यात दोन, तर गोरेगाव पोलीस ठाण्यात एका गुन्ह्याचा समावेश आहे. या चार गुन्ह्यांची दखल घेऊन त्यांना तडीपार करण्याची मागणी या शिष्टमंडळाकडून करण्यात आली. जानेवारी २०२६ या महिन्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विकास गोगावले यांच्याकडून या निवडणुकीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.आगामी निवडणुका शांततापूर्ण आणि निष्पक्षपणे पार पाडण्याच्या दृष्टीने विकास गोगावले यांच्यावर निवडणुका होईपर्यंत हद्दपार करावे, अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Murud-Janjira Fort : मुरुड-जंजिरा किल्ल्यावर आता 'हायटेक' जेट्टी

मुरुड-जंजिरा : जागतिक पर्यटनाच्या नकाशावर असलेल्या ऐतिहासिक जंजिरा जलदुर्ग किल्ल्याच्या दर्शनासाठी येणाऱ्या

Raigad : भरडखोल बंदर प्रकल्पामुळे मच्छीमारांना मिळणार अत्याधुनिक सुविधा

श्रीवर्धन : महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या सोयीसुविधांमध्ये वाढ करण्यासाठी आणि मत्स्यव्यवसायाला चालना

Raigad : रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील : पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई: रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या पर्यटनांच्या कामांना गती

Tourists on Raigad's Beaches : रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची विक्रमी गर्दी; समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरले

रायगड : महाराष्ट्र दिनाची सुट्टी, त्याला जोडून आलेला शनिवार-रविवार आणि शाळांच्या परीक्षा संपल्यानंतर लागलेल्या

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात, २५ वर्षीय चालकाचा चिरडून मृत्यू

श्रीवर्धन – श्रीवर्धन येथे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. म्हसळा

रायगड जिल्ह्यातील अंबा व कुंभे उदंचन जलविद्युत प्रकल्प क्षमतावाढीसाठी CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'एनटीपीसी'शी सुधारित सामंजस्य करार

मुंबई : एनटीपीसी लिमिटेडच्या रायगड जिल्ह्यातील कुंभे व अंबा उदंचन जलविद्युत प्रकल्पांच्या स्थापित