रायगडमध्ये जड-अवजड वाहनांसाठी वाहतूक बंदी

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अधिसुचना


अलिबाग : ३१डिसेंबर व नववर्षाच्या स्वागतानिमित्त रायगड जिल्ह्यात पर्यटकांची गर्दी होत असल्याने स्थानिक नागरिक व पर्यटकांचा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीकोनातून, तसेच अपघाताचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून रायगडमध्ये जड-अवजड वाहनांसाठी वाहतूक बंदी अधिसुचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे. खारपाडा ते कशेडी, माणगाव-ताम्हाणी घाटमार्गे दिघी, कर्जत-पळसदरी-खोपोली-पालीफाटा-वाकण, वडखळ-अलिबाग, चौकफाटा-कर्जत राज्यमार्ग, अलिबाग-मुरुड राज्यमार्ग व अलिबाग-मांडवा या महामार्ग व राज्यमार्गांवरून ३१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते १ जानेवारी २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत जड-अवजड वाहनांसाठी या मार्गावर ही बंदी राहणार आहे.


रायगड जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्याने ३१ डिसेंबर रोजी व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रमाणात पर्यटक हे मांडवा, किहीम, अलिबाग, आक्षी, नागाव, रेवदंडा, काशिद, मुरूड, दिवेआगर, श्रीवर्धन, महाड, कर्जत, माथेरान, खालापूर, इमॅजिका, पाली, महड, रायगड किल्ला अशा पर्यटन स्थळी मोठ्या प्रमाणात आपआपली वाहने घेऊन येत असतात. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, तसेच शहरामध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असून, त्यातच महामार्गावरील जड-अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असते. ही वाहतूक बंदी दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस, औषधे, ऑक्सीजन, भाजीपाला, पाणी इत्यादी जीवनाश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने, पोलीस वाहने, फायर ब्रिगेड वाहने, रुग्णवाहिकांना लागू राहणार नाही, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या कालावधीत वाहन चालकांनी पर्यायी नियोजन करावे व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Comments
Add Comment

Murud-Janjira Fort : मुरुड-जंजिरा किल्ल्यावर आता 'हायटेक' जेट्टी

मुरुड-जंजिरा : जागतिक पर्यटनाच्या नकाशावर असलेल्या ऐतिहासिक जंजिरा जलदुर्ग किल्ल्याच्या दर्शनासाठी येणाऱ्या

Raigad : भरडखोल बंदर प्रकल्पामुळे मच्छीमारांना मिळणार अत्याधुनिक सुविधा

श्रीवर्धन : महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या सोयीसुविधांमध्ये वाढ करण्यासाठी आणि मत्स्यव्यवसायाला चालना

Raigad : रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील : पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई: रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या पर्यटनांच्या कामांना गती

Tourists on Raigad's Beaches : रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची विक्रमी गर्दी; समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरले

रायगड : महाराष्ट्र दिनाची सुट्टी, त्याला जोडून आलेला शनिवार-रविवार आणि शाळांच्या परीक्षा संपल्यानंतर लागलेल्या

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात, २५ वर्षीय चालकाचा चिरडून मृत्यू

श्रीवर्धन – श्रीवर्धन येथे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. म्हसळा

रायगड जिल्ह्यातील अंबा व कुंभे उदंचन जलविद्युत प्रकल्प क्षमतावाढीसाठी CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'एनटीपीसी'शी सुधारित सामंजस्य करार

मुंबई : एनटीपीसी लिमिटेडच्या रायगड जिल्ह्यातील कुंभे व अंबा उदंचन जलविद्युत प्रकल्पांच्या स्थापित