पुण्यात २ हजार कोटींची गुंतवणूक

तब्बल ५ हजार रोजगार निर्मितीचा दावा


मुंबई : पुण्यातल्या रांजणगावमध्ये इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर होणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी केल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून दिली आहे. पुण्यात होणाऱ्या या प्रकल्पात जवळपास २ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक, तर ५ हजार रोजगार निर्मिती होईल, असा दावाही फडणवीस यांनी केला आहे.


https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1586979533328379904

केंद्रीय राज्यमंत्री राजीव शेखर यांनी केलेल्या घोषणेनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार कोरोना काळानंतर इलेक्ट्रॉनिक्स ग्लोबल सप्लाय चेनमध्ये भारत महत्त्वाची भूमिका पार पाडेल, असे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार पुण्यातले रांजणगाव, तामिळनाडू, कर्नाटक, नोएडा, तिरुपती येथे हा प्रकल्प होणार आहे. त्यानुसार पुण्यात दोन हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे.


या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात मजबूत इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टम तयार होईल. त्यामुळे औद्योगिक इलेक्ट्रॉनिक्स, ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, सोलर पीव्ही उत्पादन, ई-मोबिलिटी उत्पादनाचे प्रकल्प राज्यात येणार आहेत, असे फडणवीस म्हणतात.


https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1586979557445632000

एकूण २९७.११ एकर जागेवर हे क्लस्टर साकारले जाणार आहे. त्यासाठी ४९२.८५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यासाठी २०७.९८ कोटी रुपये केंद्र सरकार महाराष्ट्राला देणार आहे. सध्या या प्रकल्पांतर्गत आयएफबी रेफ्रिजरेशनचे काम सुरू आहे. या कंपनीने साडेचारशे कोटींची गुंतवणूक केली आहे, अशी माहितीही फडणवीस यांनी ट्विट करून दिली.


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या क्लस्टरसाठी जोरदार प्रयत्न केले होते. या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर फडणवीस यांनी एक ट्विट करून पंतप्रधान मोदी यांचे आभारही मानले आहेत. त्यात ते म्हणतात, भारत सरकारने इलेक्ट्रॉनिक्स विषयक राष्ट्रीय धोरणांतर्गत पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरला मान्यता दिल्याने मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा अत्यंत आभारी आहे. केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी महाराष्ट्राच्या प्रस्तावावर विचार केला. त्याला त्वरित मंजुरी दिली. त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद., असे ट्विट फडणवीस यांनी केले आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आता कर्करोग उपचार केंद्र! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

मुंबई: सध्या कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले असून, यामुळे दरवर्षी अनेक लोकं मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना वाढत

साठवून ठेवलेला कांदा खराब होत असल्याने शेतकरी चिंतेत

धुळे : धुळे तालुक्यातील नगाव येथील शेतकरी दिनेश पाटील यांनी साधारण २० ते २५ क्विंटल कांदा हा उकिरड्यावर फेकला

रामटेक चित्रनगरीसाठी ६० एकर जमिनीचे येत्या १५ दिवसात हस्तांतरण : ॲड आशिष शेलार

रामटेक चित्रनगरी व संरक्षित स्मारक संवर्धनातून विकास व वारसा जपण्यात येईल : वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड.आशिष

Pune Crime News : नोटीस फाडली, पोलिसांवर कुत्र्यांचा हल्ला, वादग्रस्त IAS अधिकारी खेडकर कुटुंबाचा खतरनाक खेळ उघडकीस

पुणे : बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या घरावर पुन्हा एकदा पोलिसांनी नोटीस लावली आहे.

राज्यात टीईटी परीक्षा २३ नोव्हेंबरला

पुणे : इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात अध्यापनासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार डरकाळी

 ताडोबा आणि पेंचमधून आठ वाघांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर सातारा : देशातील प्रमुख पाच व्याघ्र अभयारण्यांपैकी