तिरुवनंतपुरममध्ये एनडीएने इतिहास रचला, केरळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यूडीएफचा विजय

तिरुवनंतपुरम : भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने शनिवारी तिरुवनंतपुरम कॉर्पोरेशनमध्ये इतिहास रचला, जिथे त्यांनी एलडीएफच्या ४० वर्षांच्या राजवटीचा अंत करून महापालिकेवर नियंत्रण मिळवले.


तिरुवनंतपुरम महानगरपालिकेतील १०१ वॉर्डापैकी एनडीएने ५०, एलडीएफने २९, यूडीएफने १९ आणि दोन अपक्ष उमेदवारांनी जिंकले. भाजपने केरळमध्ये २६ ग्रामपंचायती तसेच दोन महापालिकांव विजय मिळवला. पण चर्चा आहे ती तिरुवनंतपुरम महानगरपालिकेत भाजपने मिळवलेल्या विजयाची. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत भाजपच्या केरळमधील कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे आणि नेत्यांचे जाहीर अभिनंदन केले. मागील अेक पिढ्यांपासून केरळमध्ये बलिदान देणाऱ्या शेकडो भाजप कार्यकर्त्यांना हा विजय म्हणजे आदरांजली आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. पक्षासाठी कार्यकर्ते ही खरी ताकद असल्याचे पंतप्रधान मोदींनी आवर्जून नमूद केले.


केरळमधील तिरुवनंतपुरम महानगरपालिकेतील विजय हा भाजपच्या सातत्याने केलेल्या प्रयत्नांचे फळ आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले. केरळमधील राजकीय वातावरण बदलत असल्याचे हे ताजे उदाहरण आहे, असेही ते म्हणाले. तो काळ दूर नाही जेव्हा मतदार काँग्रेस, त्यांचे समर्थक, डावे यांना सोडून भाजपला भरघोस मतदान करू लागतील, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Rajgad Accident : राजगडाच्या वाटेवर भीषण अपघात! पाबे घाटात मिनी बस २५ फूट दरीत कोसळली; दोन पर्यटकांचा मृत्यू, अनेक जण जखमी

पुणे : किल्ले राजगड (Rajgad Fort) येथे पर्यटनासाठी (Tourism) निघालेल्या मुंबईतील अंधेरी येथील पर्यटकांच्या मिनी बसचा (Mini Bus) पुणे

Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज समान नागरी कायद्याचे जनक - मंत्री नितेश राणे

विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करण्याबाबत केले आश्वस्त मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने समान नागरी

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच पावसाच्या सरी बरसणार

मुंबई : वाढत्या उष्णते मध्ये दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो

NCMC Card : वृद्ध असो की विद्यार्थी; सवलतीसाठी आता १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक

एसटीतील सवलतीसाठी १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक  मुंबई : राज्य मार्ग परिवहन (ST) महामंडळाच्या बसमधील सवलतीच्या

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या