तिरुवनंतपुरममध्ये एनडीएने इतिहास रचला, केरळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यूडीएफचा विजय

तिरुवनंतपुरम : भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने शनिवारी तिरुवनंतपुरम कॉर्पोरेशनमध्ये इतिहास रचला, जिथे त्यांनी एलडीएफच्या ४० वर्षांच्या राजवटीचा अंत करून महापालिकेवर नियंत्रण मिळवले.


तिरुवनंतपुरम महानगरपालिकेतील १०१ वॉर्डापैकी एनडीएने ५०, एलडीएफने २९, यूडीएफने १९ आणि दोन अपक्ष उमेदवारांनी जिंकले. भाजपने केरळमध्ये २६ ग्रामपंचायती तसेच दोन महापालिकांव विजय मिळवला. पण चर्चा आहे ती तिरुवनंतपुरम महानगरपालिकेत भाजपने मिळवलेल्या विजयाची. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत भाजपच्या केरळमधील कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे आणि नेत्यांचे जाहीर अभिनंदन केले. मागील अेक पिढ्यांपासून केरळमध्ये बलिदान देणाऱ्या शेकडो भाजप कार्यकर्त्यांना हा विजय म्हणजे आदरांजली आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. पक्षासाठी कार्यकर्ते ही खरी ताकद असल्याचे पंतप्रधान मोदींनी आवर्जून नमूद केले.


केरळमधील तिरुवनंतपुरम महानगरपालिकेतील विजय हा भाजपच्या सातत्याने केलेल्या प्रयत्नांचे फळ आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले. केरळमधील राजकीय वातावरण बदलत असल्याचे हे ताजे उदाहरण आहे, असेही ते म्हणाले. तो काळ दूर नाही जेव्हा मतदार काँग्रेस, त्यांचे समर्थक, डावे यांना सोडून भाजपला भरघोस मतदान करू लागतील, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Kolhapur Women Abuse Case : धक्कादायक! परतवाडा प्रकरणाची कोल्हापुरात पुनरावृत्ती; तरुणीवर अत्याचार करून ...

मुंबई : नाशिक आणि अमरावतीतील घटनांनंतर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त होत असतानाच आता कोल्हापूर

Vande Bharat : पुण्यात वंदे भारतचा डबा घसरला

पुणे : पुणे स्टेशनजवळ संध्याकाळी २२२२५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा चौथा डबा

Land Scam : अमरावती भूखंड घोटाळ्याची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी

मुंबई : अमरावती शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षित असलेले भूखंड अन्य व्यक्तींना बेकायदेशीरपणे

Agriculture Minister Dattatray Bharne : "बोगस बियाणे ओळखण्यासाठी बियाण्यांची डीएनए फिंगर प्रिंट टेस्ट केली जाणार" : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

"बियाण्यांची डिजिटल नोंद ठेवण्यासाठी ‘साथी’ पोर्टलचा वापर बंधनकारक : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बियाणे उत्पादक

लक्ष द्या ! लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख टाकणे अनिवार्य होणार ? नेमकी शिफारस काय ?

लग्न म्हणजे दोन व्यक्तींचे , दोन कुटुंबाचे मिलन. पण वयोमर्यादा अपूर्ण असली तरी अनेक लग्न होतात, अर्थात बालविवाह

Crime : पत्नीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल, मित्रावर संशय गेला; पारा चढला अन मित्रानंच मित्राचा काटा काढला

Beed Crime : बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढल्याचं चित्र आहे. बीडमध्ये मैत्रीला काळिमा