हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले, पुढील अधिवेशन २३ फेब्रुवारीला मुंबईत

नागपूर : नागपुरच्या गुलाबी थंडीत गेल्या एक आठवड्यापासून सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे सूप अखेर वाजले. पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार, दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी विधान भवन मुंबई येथे होणार आहे.



हिवाळी अधिवेशनात ७२ तास ३५ मिनिटे कामकाज झाले. अन्य कारणांमुळे १० मिनिटे वाया गेली. प्रतिदिन सरासरी कामकाज १० तास २२ मिनिटे होते. या अधिवेशनात एकूण ७ हजार २८६ तारांकित प्रश्न प्राप्त झाले, त्यापैकी २१५ प्रश्न स्वीकारण्यात आले, उत्तरीत झालेले प्रश्न २७ होते. विधानसभेत एकूण १८ शासकीय विधेयक मांडण्यात आली, त्यातील १६ विधेयक संमत करण्यात आली.



विधान परिषदेत ४ विधेयक संमत करण्यात आली. अधिवेशनात १ हजार ८६७ लक्षवेधी सूचना प्राप्त झाल्या, त्यातील २९९ लक्षवेधी स्वीकारण्यात आल्या, तर ७० सूचनांवर चर्चा झाली. अधिवेशनात आमदारांची अधिकाअधिक ९०.९८ टक्के उपस्थिती होती, अल्प उपस्थिती ४३.८५ टक्के होती. एकूण सरासरी उपस्थिती ७५.९४ टक्के होती, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली.


Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : नार्को टेस्ट करण्यास मी तयार!

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मनोज जरांगेंच्या आरोपांवर दिले सडेतोड उत्तर मुंबई :

Ashok Kharat Case : हाताला लकवा तरी..., भोंदू खरातचा आणखी एक कारनामा उघड

Ashok Kharat Case : समता पतसंस्थेच्या राहाता शाखेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) याने पैशांचा भरणा

Devendra Fadnavis : जातपडताळणी समितीच्या कामकाजात राज्य सरकारचा हस्तक्षेप नाही!

मनोज जरांगेंच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण; कोणत्याही मंत्र्याने जाणीवपूर्वक प्रमाणपत्रे रद्द

Malegaon : चाळीसगाव फाटा ते शिवतीर्थ नवीन जलवाहिनीस महासभेत मंजुरी

Malegaon : ऐन पावसाळ्यात वारंवार जलवाहिनी फुटल्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत होते. यासंदर्भातील

Tribal Development : आदिवासींच्या उत्पादनांसाठी जागतिक बाजारपेठेचे दार उघडले

- राज्य शासनाचा पुढाकार; 'शबरी नॅचरल्स' ब्रँडचे नाशिकच्या दिंडोरीत प्रक्रिया युनिट मुंबई : राज्यातील आदिवासी

Nagpur Crime : लॉजवर घेऊन गेला अन् 30 तास हात पाय बांधून नको ते केलं, नागपूर पोलिसांकडून आरोपीला अटक

नागपूर : नागपुरात (Nagpur) 16 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरण आणि गंभीर अत्याचाराच्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली