महावितरणच्या भांडुप परिमंडलात वीजचोरांविरुद्ध धडक मोहीम

  84

भांडुप (वार्ताहर) : वीजवाहिनीवरील हानी कमी करण्यासाठी तसेच प्रामाणिक ग्राहकांना वीजचोरांमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी महावितरणच्या भांडुप परिमंडलचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, भांडुप परिमंडलात वीजचोरांविरुद्ध धडक मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत, सप्टेंबर २०२२ पासून ते आतापर्यंत वीजचोरी करणाऱ्या ३३३ वीजचोरांविरुद्ध कारवाई करून जवळपास २ कोटी ४५ लाखांची वीजचोरी पकडण्यात आली आहे.


महावितरण आपल्या ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी सदैव प्रयत्नशील असते. ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीज पुरविण्यासाठी झटत असतात. परंतु, अशा बेकायदेशीररित्या वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांमुळे अधिकारी, कर्मचारी तसेच प्रामाणिक ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो. ऐन दिवाळीच्या काळात आपल्याला अंधारात जावे लागू नये तसेच आपल्या विरुद्ध कारवाई होऊ नये म्हणून ग्राहकांनी प्रामाणिकपणे विजेचा वापर करावा.


भांडुप परिमंडलातील ठाणे, वाशी व पेण या मंडळ कार्यालयांतर्गत गेल्या महिनाभरापासून वीजचोरांविरुद्ध धडक मोहीम सुरू आहे. ही मोहीम अधिक तीव्र होणार असून ठाणे, वाशी व पेण मंडळात अधीक्षक अभियंत्यांनी सप्टेंबर २०२२ पासून ३३३ जणांची वीजचोरी उघडकीस आणली आहे. त्यातील १८४ प्रकरणात वीज कायदा-२००३ च्या कलम १३५ नुसार ११७.७ लाखांची, तर ८२ प्रकरणांत कलम १२६ नुसार १०५.१७ लाखांची वीजचोरी पकडली आहे. यामध्ये अनेक ठिकाणी मीटरशी छेडछाड करणे किंवा मीटर बायपास करणे आढळून आले आहेत. या शिवाय वीजतारांवर थेट आकडे टाकून २२.०९ लाखांच्यी वीजचोरीची ६७ प्रकरणे उघडकीस आली आहेत.


महावितरण भांडुप परिमंडलचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी वीजचोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा देऊन सर्व ग्राहकांना प्रामाणिकपणे वीज जोडणी घेऊन वीज वापर करण्याचे आवाहन केले असून ग्राहकांनी नियमितपणे वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे अशी विनंती केली आहे.

Comments
Add Comment

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यापन कारकीर्दही प्रेरणादायी – सरन्यायाधीश भूषण गवई

डॉ.आंबेडकर यांच्या अध्यापन कारकीर्दीस ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शासकीय विधि महाविद्यालय येथे स्मृतिपटलाचे

मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून थेट पाहता येणार!

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून थेट पाहता येणार आहे. कामकाजाचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह

मनसैनिकांनी कार्यालय फोडल्यानंतर व्यावसायिक सुशील केडियांनी मागितली माफी

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया यांच्या

Eknath Shinde : "आजचा मेळावा म्हणजे द्वेष, जळजळ, मळमळ..."; उपमुख्यमंत्री शिंदेचा राज-उद्धव मेळाव्याला टोला

"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा" : उपमुख्यमंत्री शिंदे मुंबई : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे २०

मराठीप्रेम म्हणजे निवडणुका जवळ आल्या की राजकीय नौटंकी!

भाजपा नेत्यांनी उडवली ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची खिल्ली! मुंबई: गेल्या दोन महिन्यांपासून ठाकरे बंधूंच्या

संचमान्यतेमुळे राज्यातील ८८४ शाळा बंद पडण्याच्या मार्गावर

कोकणातील ९९ शाळांनाही बसणार फटका मुंबई : शिक्षण विभागाने संचमान्यतेचा निर्णय घेतल्यानंतर त्याचा फटका